Mumbai : डांबराच्या चकचकीत रस्त्याची धुलाई

केडीएमसीतील धुळीने माखलेले रस्ते गबाळे
Mumbai NEWS
Mumbai NEWSesakal

डोंबिवली : केडीएमसी क्षेत्रातील हवेची गुणवत्ता पातळी सुधारण्यासाठी रस्त्यांची धुलाई केली जात असून धुळीने माखलेले मुख्य रस्ते मात्र गबाळे आहेत. केडीएमसी क्षेत्रातील हवेची गुणवत्ता पातळी खालावली आहे. रस्त्यांवर उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक कमालीचे हैराण झाले असून यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने ऑक्टोबर महिन्यात दोन धूळ संयंत्र नियंत्रक खरेदी केलेले आहेत. मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता सुधारली नसून कल्याणमधील हवेचा निर्देशांक हा 123 च्या घरात आहे.

Mumbai NEWS
Hair Care Tips : कोरड्या आणि फ्रिझी केसांना मऊ बनवायचे आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

धूळ नियंत्रण करणारी ही संयंत्र नेमकी कोठे फिरतात हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. ठाकुर्लीतील 90 फिट या डांबराच्या रस्त्यावर ते वारंवार फिरत असून शहरातील मुख्य खराब रस्ते, एमआयडीसी, ग्रामीण भागातील रस्ते अद्यापही धूळीने माखलेले असून जनतेचा पैसा पाण्यात जात असल्याची बोलले जात आहे.

Mumbai NEWS
Makeup Tips : हिवाळ्यातला मेकअप म्हणजे चेहऱ्याला पिठ लावल्यासारखंच दिसतं? या स्टेप्सनी मिळवा मेकअपचा खरा ग्लो!

कल्याण डोंबिवली शहराची हवेची गुणवत्ता पातळी ही गेल्या काही वर्षापासून खालावलेली आहे. शहरात सुरु असलेली बांधकामे, रस्त्यांची कामे या वायू प्रदुषणात आणखीनच भर घालत आहेत. डांबरी रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहता प्रशासनाने पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी खडी, माती, सिमेंट मिश्रीत खडीचा भराव त्यात टाकला. परंतू पावसाने उघडीप देताच ही खडी रस्त्यावर पसरून वाहनांमुळे त्यातून धुरळा उडू लागला. तसेच अनेक ठिकाणी रस्त्यांची सिमेंट कॉंक्रीटीकरणाची कामे सुरु आहेत.

Mumbai NEWS
Career Tips : ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवमध्ये यश मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

यामुळे देखील सिमेंट मातीचा धुरळा हवेत उडत असून त्याचा त्रास नागरिक गेले काही वर्षे सहन करत आहेत. वर्षानुवर्षे कल्याण डोंबिवलीकर धूळीचा त्रास सहन करत असताना अखेर पालिका प्रशासनास त्याची उपरती झाली आणि पालिकेने शहरातील वायू प्रदुषण कमी करण्यासाठी कोटी रुपये खर्च करीत धूळ नियंत्रण संयत्र खरेदी करण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यात घेतला. दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्याची निविदा प्रक्रीया पूर्ण होत ही दोन संयत्र पालिकेच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात दाखल झाली आहेत.

Mumbai NEWS
Investment Tips सोन्यात गुंतवणूक म्हणजे दागिने खरेदी नव्हे!

नागरिकांच्या सोयीसाठी ही वाहने दाखल होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र मुख्य धुळीच्या रस्त्यांवर ही वाहने फिरकली देखील नसल्याची तक्रार नागरीक करतात. ठाकुर्ली येथील 90 फिट रोडवर सातत्याने ही वाहने फिरवली जात आहेत. हा रस्ता डांबराचा असून तो चकाचक असताना तो का पुन्हा स्वच्छ स्वच्छ केला जात आहे ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या रस्त्यावर पालिकेचे कार्यालय आहे. त्यासोबतच येथे बडे गृहप्रकल्प असून त्यांना खूश ठेवण्यासाठी पालिका प्रशासन हे करीत असस्याची ओरड होत आहे. मानपाडा रोड, कल्याण शीळ रोड, एमआयडीसी परिसरातील रस्ते, कल्याण शीळ समांतर रोड, दिवा संदप रोड यांसारख्या अनेक रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असून त्याठिकाणी एकदाही हे संयंत्र फिरकले नसल्याचे नागरिक सांगतात.

Mumbai NEWS
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

कल्याण मधील हवेचा निर्देशांक हा 5 डिसेंबरला 123 एवढा नोंदविला गेला आहे. शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर ही वाहने धूळ नियंत्रणाचे काम करतील. वाहनांमुळे धूळ उडू लागली की ही वाहने प्रक्रिया केलेल्या पाण्याचा फवारा हवेत मारुन उडणारी धूळ जमिनीवर बसविण्याचे अथवा धुळीला आहे त्या ठिकाणीच बसविण्याचे काम करणार आहेत. असे असताना ज्या भागात धूळ आहे त्याठिकाणी हे संयंत्र फिरवणे आवश्यक असताना ते का फिरवले जात नाहीत असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कल्याण व डोंबिवलीसाठी प्रत्येकी एक वाहन आहे. प्रत्येक प्रभागासाठी त्यांना दिवस ठरवून देण्यात आले असून त्याचे नियोजन स्वच्छता अधिकारी व प्रभाग अधिकारी यांच्याकडून केले जाते.

- अतुल पाटील, उपायुक्त, घनकचरा विभाग.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com