मुंबई : शनिवारी राज्यात 48 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला; एका दिवसातील मृतांची ही सर्वाधिक संख्या आहे. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 779 वर पोहोचला आहे. राज्यात 1165 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची एकूण संख्या 20 हजार 228 झाली आहे. आणखी 330 रुग्ण बरे होऊन घरी गेले; त्यामुळे आतापर्यंत एकूण 3800 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोव्हिड-19 विषाणू संसर्गाने शनिवारी राज्यातील आणखी 48 व्यक्तींचा बळी घेतला. मुंबईत 27, पुणे शहरात 9, मालेगाव शहरात 8 आणि अकोला शहर, नांदेड शहर, अमरावती शहर व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. मालेगाव शहरातील 8 मृत्यू 25 एप्रिल ते 8 मे या कालावधीतील आहेत.
शनिवारी 21 पुरुष आणि 27 महिलांचा मृत्यू झाला. या 48 जणांपैकी 27 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 18 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि 3 रुग्ण 40 वर्षांखालील होते. मृतांमधील 9 जणांची अन्य आजारांबाबतची माहिती मिळाली नाही. उर्वरित 39 रुग्णांपैकी 28 जणांना (72 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात आतापर्यंत 779 जण दगावले आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे
number of corona victims in the state today crossed one thousand, 48 people died in one day
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.