मुंबईतील पूरनियंत्रणासाठी 'हा' पॅटर्न ठरणार उपयोगी?; महापालिका करतेय विचार

मुंबईतील पूरनियंत्रणासाठी 'हा' पॅटर्न ठरणार उपयोगी?; महापालिका करतेय विचार

मुंबई : भरपूर पाऊस पडला म्हणून मुंबईत पाणी साचले, हे आता नित्याचेच झाले आहे. मुंबईत जोरदार पाऊस आल्यास आणि त्याचवेळी समुद्रास उधाण असल्यास मुंबईची तुंबई होतेच. जोपर्यंत समुद्राची भरती कमी होत नाही, तोपर्यंत मुंबईतील साचलेल्या पाण्याचा निचरा कमी होत नाही. मुंबईत पावसाचे साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा मुंबई महापालिका अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. मुंबईत पडणारे  पावसाचे पाणी जमिनीखाली साठवले तर...? मुंबई महापालिकेने गतवर्षी या प्रस्तावाचा विचार केला आणि त्यासाठी माफक तरतूदही केली आहे. 

मुंबईत खूप कमी कालावधीत भरपूर पाऊस पडतो आणि त्यामुळे मुंबईतील पाणी वाहून जाण्याच्या व्यवस्थेचा पूर्ण कस लागतो. सध्याची व्यवस्था तासाला 50 मिलीमीटर पाण्याचा निचरा करु शकते. आता हे अतिरीक्त पाणी साठवण्याच्या जागेची मुंबईला गरज असल्याचे वृत्त आहे. टोकियोतील पूराच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था तसेच दक्षिण कोरियातील जमिनीखालील तळ्यांच्या संकल्पनेचा विचार करुन मुंबईत या प्रकारची व्यवस्था तयार करण्याचा विचार होत आहे. 

बदलत्या हवामानामुळे काही तासात भरपूर पाऊस होण्याचे दिवस भविष्यात वाढणार आहेत. आता यासाठी पाणी निचरा होणाऱ्या यंत्रणेवरील ताण कमी करण्याचा विचार होत आहे. आता हे पूरस्थिती निर्माण करणारे पाणी जमिनीखाली साठवले आणि पाऊस थांबवल्यावर तेच समुद्रात सोडले किंवा पुनर्वापर केला तर पूर येणार नाही. हे तांत्रिकदृष्ट्या फारसे अवघड नाही. याबाबत प्रशासन विचार करीत आहोत. यासंदर्भात  चर्चाही केल्याचे मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

दक्षिण मुंबईत 5 ऑगस्टला 46 वर्षातील एका दिवसातील सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे या परिसरातील अनेक भागात प्रथमच पाणी साचले. जमिनीखाली तळी तयार करण्याचा खर्च खूप जास्त असेल, पण शहराबाबत दूरगामी विचार करावाच लागेल. यापूर्वीच पवई आणि विहार तलावातून मिठी नदीत जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी तळी बांधण्याचे ठरवले आहे. त्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी निविदाही काढण्यात आली आहे.

गतवर्षी तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी हे पाणी साठवण्याचा विचार केला होता. त्यावेळी जपानमधील तज्ज्ञही आले होते. एवढेच नव्हे तर जपानमधील कंपनीच यासाठी अर्थसाह्य करण्याचा विचारही केला होता. त्यानंतर अर्थसंकल्पात पाच कोटीची तरतूदही करण्यात आली, पण त्यानंतर पुढे काही घडले नाही.
---
संपादन : ऋषिराज तायडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com