पालघर जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली, धामणी धरण तुडूंब

dhamani dam
dhamani dam

कासा : डहाणू तालुक्‍यातील प्रमुख मानले जाणारे धामणी धरण अखेर रविवारी पूर्ण भरले. त्यामुळे रविवारी धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. सध्या धरण क्षेत्रात सतत जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून पाणीसाठ्यामध्ये वाढ होत आहे.

धामणी धरणातून डहाणू, पालघर, विक्रमगड तालुक्‍यातील अनेक गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो. त्याचबरोबर वसई-विरार नगरपालिका, तारापूर, बोईसर येथील औद्योगिक वसाहतीना देखील पाणीपुरवठा होतो. यामुळे यंदाच्या पावसाने पालघर जिल्ह्यातील नागरिकांची पुढील वर्षांची पाण्याची चिंता मिटली आहे.

धामणी धरण 96.22 टक्के भरले आहे. रविवारी सकाळी 11 वाजता 1.5 फूट धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 4655.62 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. तर कवडास धरण 100 टक्के भरले असून त्यातून 1061 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत होत आहे. त्यामुळे सूर्या नदीचा पातळी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदी किनारी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देत नदी किनारी मासेमारी न करण्याचे आवाहन देखील केले आहे. 

धामणी धरण - 

  •    पाणीसाठा          -            उपयुक्त साठा 

           118.60 मिटर        -       276.350 द. ल.घ.मी. 

  • पाणीसाठा पातळी    -              पाणीसाठा 
  •     (रविवार) - 

           117.75 मिटर         -       274.876 द. ल.घ.मी. 

(संपादन : वैभव गाटे)

palghar districts water concern is over Dhamani dam is overflowing

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com