Mumbai : RPI आठवले गट मुंबई महापालिका युतीने लढवणार

उत्तर भारतीय आघाडीची पक्षाकडून घोषणा
RPI Athawale Group alliance Mumbai Municipal Corporation
RPI Athawale Group alliance Mumbai Municipal Corporationsakal

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाकडून आगामी मंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २५ ते ३० जागा लढवण्यात येणार आहे. त्यापैकी उत्तर भारतीय बहुल भागातूनही उमेदवारी देण्यात येईल. केंद्रात भाजपसोबत आरपीआय (आठवले) गट युतीत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतही ही युती कायम राहणार असल्याची माहिती आरपीआयचे सरचिटणीस गौतम सोनावणे यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उत्तर भारतीय आघाडीची घोषणा आरपीआय गटाकडून करण्यात आली. 

उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदावर श्यामधर दुबे, सरचिटणीस रमेश संतलाल गौड आणि चिटणीस पदावर राकेश यादव यांची घोषणा यावेळी करण्यात आली. एक आठवड्यातच मुंबई कमिटी आणि इतर जिल्हा तसेच तालुका कमिटीची रचना करण्यात येणार आहे. रामदास आठवले यांच्यावर गेल्या ३० वर्षांपासून मुंबईतील हजारो उत्तर भारतीय लोकांनी विश्वास ठेवला आहे. आठवलेंचा विचार घेऊन तळागातील समाजापर्यंत पोहचणार असल्याचे श्यामधर दुबे यांनी सांगितले. 

उत्तर भारतीय समाजाच्या अनेक वस्त्या या आठवलेंच्या स्थानिक पातळीवर असलेल्या कामामुळे आज स्थिरावल्या आहेत. मुंबईतील बहुतांश झोपडीवासीय भागात आजही आरपीआय आठवले गटाच्या कामामुळे मुंबईतील नागरिकामध्ये सुरक्षित असल्याची भावना आहे. त्यामुळेच येत्या काळातही उत्तर भारतीयांच्या सेवेत अधिकाधिक मदत देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे दुबे म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर भारतीयांसाठीच्या टोल फ्री क्रमांकाची घोषणाही केली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com