अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबाबत संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

sanjay raut anil deshmukh.
sanjay raut anil deshmukh.

मुंबई- माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या एका पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत. गृहमंत्र्यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप त्यांनी पत्रात केलाय. या आरोपावरुन विरोधक आक्रमक झाले असून गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी शिवसेनेनंही राष्ट्रवादीवर दबाव वाढवला असल्याचं सांगण्यात येतंय. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीचं सरकार येऊन दीड वर्ष झाले असून सरकारमधील प्रत्येकाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले आहे. रविवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. 

नक्कीच हा मोठा आरोप आहे, पण मी यावर काही बोलावं असा विषय नाही. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी नक्कीच सणसणाटी आणि खळबळजनक असे पत्र लिहिले आहे. लोक म्हणतायहेत हा लेटरबॉम्ब आहे, पण त्यात सत्यता किती आहे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार तपासून पाहतील. स्वत: अनिल देशमुखांनी पत्राच्या सत्यतेबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. पण हा सगळा  प्रकार पाहिल्यानंतर सरकारमधील प्रत्येकाने आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचं संजय राऊत म्हणालेत. 

अशा प्रकारचे आरोप महाविकास आघाडीवर होणं दुर्दैवी आहे. अशा प्रकारचे आरोप कोणा मंत्र्यावर किंवा सरकारवर होणं हे नक्कीच वाईट आहे. सत्तेच्या बाहेर असणाऱ्या आणि सरकार यावं यासाठी खारिचा वाटा उचलणाऱ्या माझ्यासारख्यांसाठी हा धक्कादायक आरोप आहे. सरकारला दीड वर्ष झालं आहे. सरकारमधील प्रत्येकाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आपले पाय तपासायला हवेत, नक्की जमिनीवरच आहेत का, असंही संजय राऊत म्हणाले.  गेल्या काही दिवसांपासून पोलिस प्रशासनात जे घडतंय ते दुर्दैवी आहे, महाराष्ट्राचा कणा म्हणून आपण पोलिस प्रशासनाकडे पाहतो , राज्य कर्त्यांनी हा कणा मजबुत ठेवायचो असतो, पण काहीतरी दुरुस्त करावे लागले, असंही ते म्हणाले. 

एका विशिष्ठ कारणामुळे परमबीर सिंह यांना पदावरुन जावं लागलं, ते उत्तम अधिकारी होते, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम केले आहे. परमबीर सिहांनी याबाबत पत्र लिहून निर्णय घेण्यास मुख्यमंत्र्यांना सूचवलं आहे. शरद पवार याबाबत योग्य निर्णय घेतील, ते दिल्लीत आहेत, मी दिल्लीला जाणार आहे. त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. पण, या प्रकरणामुळे सरकारवर नक्कीच शिंतोडे उडालेत, असंही ते म्हणाले. 

दरम्यान, संजय राऊतांनी रविवारी सकाळी एक ट्विट केलंय, यासंदर्भात विचारल्यास संजय राऊत म्हणाले की, 'याचा अर्थ तुम्हाला लवकरच कळेल'. त्यामुळे त्यांच्या या ट्विटचा नेमका अर्थ काय याबाबत उत्सुकता आहे. शिवाय आज एक मोठा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com