अनलॉकनंतरही रेल्वे स्थानकातील स्टॉल्स बंदच राहण्याची चिन्हे

अनलॉकनंतरही रेल्वे स्थानकातील स्टॉल्स बंदच राहण्याची चिन्हे

मुंबई ः जवळपास अडिच महिन्यांच्या लॉकडाऊन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न होत आहे. सोमवारपासून देशातील ट्रेन्सची संख्या वाढणार असल्याने रेल्वे स्थानकातील स्टॉल्स सुरु करण्याचे ठरवले, पण अनेक स्टॉलचालक त्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे. 

रेल्वेने 35 टक्के कर्मचाऱ्यांसह काम सुरु करण्याचे ठरवले आहे, पण त्यांना सर्व स्टॉल्स खुले करायचे आहेत, अशी तक्रार काही चालकांनी केल्याचे समजते. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पीपीई कीट असतानाही लागण होते. या परिस्थितीत आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे काय अशी विचारणा होत आहे.
लॉकडाऊनच्यावेळी मुंबई सेंट्रल सर्व कामगारांना कमी करण्यात आले. आता त्यांना परत बोलावले तर त्यांचे विलगीकरण करावे लागेल.  काही स्टॉल चालकांनी आमचे कर्मचारी स्टॉल परिसरात रहात नाहीत. त्यांच्यासाठी लोकल प्रवासाची व्यवस्था करणार अशी विचारणा केली. 

रेल्वे आधिकाऱ्यांनी ट्रेन सुरु आहेत, त्यामुळे प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करुन देणे भाग पडणार आहे. त्यांना पॅक्ड खाद्यपदार्थ आणि पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी स्टॉल खुले करावे लागतील. आता सुरक्षेची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागेल. त्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणेही भाग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com