

मुंबईः मुंबईकरांना मिळणाऱ्या अपुऱ्या पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवण्यात येणार आहे. यासाठी समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठीच्या निःक्षारीकरण प्रकल्पाची निविदा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच काढली जाणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत मंगळवारी (ता. १८) दिली.