

Citizens have been advised to avoid waterfalls, forts, rivers and dams until further orders due to safety concerns.
Sakal
ठाणे : भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासह मुंबई महानगर प्रदेशासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले, धबधबे, धरणे, तलाव, नद्या आणि इतर पर्यटनस्थळांवर नागरिकांच्या प्रवेशास पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.