

मुंबईतील मंत्रालयात चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, एका मंत्र्यांच्या केबिनमधून तब्बल ८० हजार रुपये गायब झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच चोरीची घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.