
मुंबई : येत्या काही दिवसात गणरायाचे आगमन होणार आहे. माटुंगा, भोईवाडा, लालबाग, काळाचौकी परिसरात १७, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी गणपती आगमन मिरवणुकीच्या निमित्ताने अनेक लोकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मिरवणुकीदरम्यान या मार्गावर वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. अशी माहिती वाहतूक पोलिसांनी उप आयुक्त प्रशांत परदेशी यांनी दिली.