नव्या कृषी कायद्यातून भांडवलदारांच्या कोटकल्याणाचा डाव ; डॉ. पाटील  

j f patil comments on new farmer low
j f patil comments on new farmer low

गडहिंग्लज : केंद्र शासनाने केलेले नवे कृषी कायदे शेतीशी नाही तर शेतमालाशी निगडित आहेत. उत्पादन व्यवस्थेशी त्यांचा काडीमात्र संबंध नाही. पिकवून विकणाऱ्यांऐवजी विकत घेऊन विकणाऱ्यांचे हितसंबंध यातून जोपासले जाणार आहेत. त्यामुळे या नव्या कायद्यांतून भांडवलदार व्यापाऱ्यांचे कोटकल्याण होणार असल्याचे स्पष्ट मत अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांनी व्यक्त केले. 

येथील ओंकार महाविद्यालय आणि समाजवादी प्रबोधिनीतर्फे कार्यक्रम झाला. केंद्र सरकारचे शेतीविषयक धोरण या विषयावर बोलताना डॉ. पाटील यांनी नव्या कृषी कायद्यांच्या त्रुटींवर बोट ठेवले. ओंकार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजन पेडणेकर अध्यक्षस्थानी होते. 

डॉ. पाटील म्हणाले,"गरिबांतील गरीब माणसाचा विचार करुन शासनकर्त्यांनी धोरण ठरवणे गरजेचे असते. पण, नवे कायदे करताना या बाबीचा फारसा विचार करण्यात आलेला नाही असे दिसून येते.' 

उज्ज्वला दळवी यांनी स्वागत केले. डॉ. के. आर. तनंगे यांनी प्रास्ताविक केले. समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, श्री. पेडणेकर यांचीही भाषणे झाली. प्रा. शिवाजी होडगे, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते. प्रा. संजीवनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. धर्मवीर क्षीरसागर यांनी आभार मानले. 

 
  व्याख्यांचा खेळ... 
डॉ. पाटील म्हणाले,"नव्या कृषी कायद्यांमध्ये व्याख्यांचा खेळ मांडला आहे. ट्रेड एरिया, शेतकरी, शेतमाल, अन्नधान्य साठा या व्याख्यांचा गोंधळ आहे. त्यामध्ये भाषा एक आणि अर्थ दुसराच आहे. त्यातून दिशाभूल करण्याचा, मोहात अडकवण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून गुलाम करण्याचा हा डाव आहे.' 


संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com