कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या कटातील तीनही संशयित आरोपींची पोलिस कोठडी आज वीस सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. दहा दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर सचिन अंदुरे, अमित बद्दी आणि गणेश मिस्किन या आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एस. एस. राऊळ यांनी ही कोठडी सुनावली.
या चाैकशीसाठी वाढवली कोठडी
संशयित आरोपींनी कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन - अडीच तासांच्या एस. टी. प्रवासानंतर जंगल व्याप्त भागात दोन दिवस एअर पिस्टलने टारगेटवर फायरिंगचा सराव केला आहे. यावेळी अमल काळे, सचिन अंदुरे व इतर तीन अनोळखी व्यक्ती होत्या. त्यांचा तपास करायचा आहे. तसेच बेळगाव येथे "पाईप बॉम्ब'चे प्रात्यक्षिक घेतले आहे. त्याची माहिती घेण्यासाठी पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी आज न्यायालयात केली. यावर या तिघांना पुन्हा चार दिवसांची कोठडी वाढवण्यात आली.
पोलिस कोठडीसाठी मांडलेले महत्वाचे मुद्दे
आरोपींचे वकील समीर पटवर्धन यांनी याला आक्षेप घेतला. ते म्हणाले, आत्तापर्यंत दहा दिवस पोलिस कोठडीत पोलिसांनी काय केले? असा सवाल करीत आता खटला सुरू करावा, अशी मागणी आरोपींच्या वकीलांनी केली. वेगवगेळ्या व्यक्तींना या आरोपाखाली अटक केली जात आहे. त्यांच्याकडून काहीच निष्पन्न होत नाही. तरीही वारंवार कोठडीची मागणी केली जात आहे. गेली चार वर्षे हेच सुरू आहे. आता ट्रायल सुरू करावी, आरोपी वाढले तर ते पुरवणी यादीतून सादर करावेत, असे आमचे म्हणणे आहे. असेही ते म्हणाले. दहा दिवसानंतर पोलिस कोठडीची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अखेर दोन्ही बाजूचा युक्तीवाद विचारात घेऊन वीस सप्टेंबरपर्यंत तिन्ही संशयीत आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.