कोल्हापूर : विनाकारण फिरणाऱ्यांचे जप्त केलेले वाहन आता संचारबंदीचा कालावधी संपेपर्यंत परत दिले जाणार नाही असे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी अशी आज तब्बल 116 वाहने जप्त केली. त्याचबरोबर 'मॉर्निंग वॉक' ठिकाणे परिसरावरही पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शासनाने घालून दिलेल्या निर्देशाच पालन व्हावे यासाठी पोलिसांचा शहर परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. वारंवार सूचना करूनही विनाकरण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या वाढूच लागली आहे. अशांची वाहने जप्त करण्याचा निर्णय पोलिसांनी घेऊन कारवाईस सुरवात केली. पण ही जप्त केलेली वाहने कायदेशीर पूर्तता करून थेट संचारबंदीचा कालावधी संपल्यानंतरच चालकांच्या ताब्यात देण्याचा निर्णय अधीक्षक बलकवडे यांनी घेतला. गतवर्षी अशाच पद्धतीने केलेल्या कारवाईत तब्बल साडेचार हजाराहून अधिक वाहने लॉकडाऊन संपेपर्यंत प्रशासनाने ताब्यात ठेवली होती. आता अशाच पद्धतीच्या कारवाईला सुरवात झाली. आज पोलिसांनी दिवसभारत तब्बल 116 वाहने जप्त केली. सकाळी फिरायला, सायकलिंगसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. शहरातील पोलिस ठाण्यामार्फत हद्दीतील मॉर्निंग वॉकच्या ठिकाणावर वॉच ठेवण्यात येत आहे.
पोलिसांनी केलेली कारवाई
जप्त वाहने - 116
मॉर्निंग वॉक - 46
पोलिस ठाणे अंतर्गत मोटर व्हेईकल ऍक्ट - 324
शहर वाहतूक शाखेअंतर्गत - 1078
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.