कोल्हापूर : कोरोना काळात वाढून आलेली घरगुती वीज बिले माफ करणे व शेती पंपाच्या बिल माफी बाबत स्पष्टता, प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान, दीड लाखाच्या वर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ ,अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई अनुदान आदीबाबत सरकारने अनेक घोषणा करून एक वर्ष झाले. मात्र आश्वासनांची पूर्तता अद्यापही झालेली नाही.
राज्यातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेची सरकारकडून फसवणूक सुरू आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 24 फेब्रुवारी रोजी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत असल्याची घोषणा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांनी केली. योजनेचा लाभ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नसल्यानेच हा निर्णय घेतला असल्याचे घाटगे यांनी सांगितले.
संपादन- अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.