'किंगमेकर' विनय कोरे चर्चेच्या केंद्रस्थानी

महाडिकांशी चर्चेची जबाबदारी पेलली
विनय कोरे
विनय कोरेsakal media

कोल्हापूर : भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांना पाठिंबा दिलेले ‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे हेच महाडिक यांचा अर्ज मागे घेण्यापासून ते निवडणूक बिनविरोध करण्याच्या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. पक्षपातळीवर भाजपने माघार घेण्याचा निर्णय घेतला; पण तो माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यापर्यंत पोहचवून त्यांना माघार घेण्यासाठी राजी करण्याची जबाबदारी कोरे यांनी पेलली. यात प्रा. जयंत पाटील यांनीही भूमिका बजावल्याचे अंदाज घेतल्यानंतर स्पष्ट झाले.सहा वर्षांपूर्वी याच निवडणुकीत कोरे यांनी बळाचा पट पालकमंत्री पाटील यांच्या मागे लावला होता; पण विधानसभा निवडणुकीनंतर कोरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आमदार प्रकाश आवाडे यांनी अमल महाडिक यांना पाठिंबा जाहीर केला होता; पण निवडणूक बिनविरोध होण्यात कोरे यांचीही मध्यस्थी कामी आली.

फक्त विहिरींच्या पाण्यानेच भागायची पुणेकरांची तहान

निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना काल रात्रीपासून वेग आला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काल दिल्लीत होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पाटील यांनी थेट प्रा. पाटील यांच्याशी संपर्क साधत निवडणूक बिनविरोध करावी लागेल, असा पक्षाध्यक्ष असल्याचा निरोप दिला. यावर प्रा. पाटील यांनी आज पहाटे माजी खासदार आणि धनंजय महाडिक यांची भेट घेतली. सुरुवातीला त्यांनी विरोध दर्शवला. दरम्यान काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनी बंधू डॉ. संजय डी. पाटील यांच्यासह वारणेत जाऊन श्री. कोरे यांच्याशी चर्चा केली. श्री. महाडिक यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचे आवाहन पाटील बंधूंनी श्री. कोरे यांना केले. त्यानंतर श्री. कोरे यांनी महादेवराव महाडिक यांच्याशी संपर्क साधून अर्ज मागे घ्यावा लागेल असे सांगितले. त्यावर पक्ष जो निर्णय घेईल त्याच्याशी बांधील असून पक्षाने सांगितल्यास कोणत्याही अटीशिवाय अमल यांचा अर्ज मागे घेण्याचे आश्‍वासन दिले.

या घडामोडी घडत असताना केंद्रीय मंत्री शहा यांनी थेट धनंजय यांच्याशी फोनवरून चर्चा केली. याबाबत महादेवराव महाडिक निर्णय घेतील असे धनंजय यांनी सांगितल्यानंतर श्री. शहा यांनी थेट महादेवराव महाडिक यांच्याशीही चर्चा करून अर्ज मागे घेण्याची विनंती केली. चर्चेत भविष्यातील राजकारणाचा ‘शब्द’ही श्री. शहा यांनी दिल्याचे समजते. शहा-महादेवराव यांच्यात चर्चा झाल्यनंतर अमल यांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक बिनविरोध झाली.

विनय कोरे
महासर्वेक्षण: जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? काय म्हणतो सर्व्हे?

पालकमंत्र्यांकडून कोरेंचे आभार

अमल यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर सतेज पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, राजेश पाटील, ऋतुराज पाटील, राजू आवळे उपस्थित होते. बिनविरोध होण्यासाठी कोरे यांनी पुढाकार घेतल्याचे सांगत श्री. पाटील यांनी त्यांचे आभार मानले.

अमल तवंदीतून परत

निवडणूक होणारच याची खात्री असल्याने अमल महाडिक हे प्रा. जयंत पाटील यांच्यासोबत अंबाबाई दर्शनासाठी मंदिरात गेले. तेथून हे दोघे आजऱ्यातील मतदारांच्या भेटीसाठी आजऱ्याला चालले होते. त्या वेळी तवंदी घाटातच अमल व पाटील यांना अर्ज मागे घेण्याबाबत चंद्रकांत पाटील यांचा फोन आला. त्यामुळे तवंदी घाटातूनच अमल थेट कोल्हापूरकडे परतले. तेथून ते धनंजय यांच्या कार्यालयात आले, तेथून प्रा. पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पत्नी शौमिका यांचाही अर्ज मागे घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com