कोल्हापूर : कसबा बावडा परिसरात गेली चार वर्षे घरफोडी करणाऱ्या सागर भगवान रेणुसे (वय ३६, रा. गोळीबार मैदान, कसबा बावडा) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्याच्याकडून घरफोडीचे १४ गुन्हे उघकीस आणले असून, त्याच्याकडून १७ तोळे सोने, अडीच किलो चांदीचा ऐवज जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे २०२१ पासून तो चोऱ्या करूनही पोलिसांना (Kolhapur Police) सापडत नव्हता.