माेठी बातमी! काेल्हापूर जिल्ह्यातील १२४ गावांतील सरपंच आरक्षण बदलले; नव्याने सोडत, कागलमध्ये ८३ पैकी ८२ चा समावेश

Sarpanch Reservation: राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी जिल्ह्यातील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी ८ एप्रिल २०२५ रोजी तालुकानिहाय सोडत काढली होती; पण आठ दिवसांपूर्वी पुन्हा आधीचे आरक्षण रद्द करून आज नव्याने सोडत काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आरक्षण सोडत काढण्यात आली.
Kolhapur Sarpanch Reservation
Kolhapur Sarpanch Reservationsakal
Updated on

कोल्हापूर : नव्याने काढलेल्या सरपंचपदाच्या आरक्षणात जिल्ह्यातील सुमारे १२४ गावांतील सरपंच पदाचे आरक्षण बदलले. चंदगडमध्ये पूर्वीचेच आरक्षण कायम राहिले, तर कागल तालुक्यातील ८३ पैकी तब्बल ८२ गावांतील आरक्षणात बदल झाला. या तालुक्यातील सुळकूड या एकमेव गावचे आरक्षण पूर्वीचेच राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com