..अन्यथा मुख्यमंत्र्यांचे कोल्हापुरात काळे झेंडे दाखवून स्वागत करू; राजू शेट्टींचा स्पष्ट इशारा
ज्या साखर कारखान्यांनी (Sugar Factories) ३००० च्या वर दिला आहे, त्यांनी ५० रुपये द्यावेत, असा लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते.
जयसिंगपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ठरल्याप्रमाणे गतवर्षीचे १०० रुपये थकीत बील तातडीने देणे संदर्भात शासनाने पावले उचलावीत अन्यथा मुख्यमंत्र्याचे (Eknath Shinde) कोल्हापुरात शुक्रवारी (ता. १६) काळे झेंडे दाखवून स्वागत करू असा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.
ऊस बिलासाठी (Sugarcane Bill) २३ नोव्हेंबर २०२३ ला संघटनेने शिरोली पुलावर चक्का जाम केले. गतवर्षी तुटलेल्या उसाचे थकीत बील १०० रुपये द्यावेत, तसेच ज्या साखर कारखान्यांनी (Sugar Factories) ३००० च्या वर दिला आहे, त्यांनी ५० रुपये द्यावेत, असा लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मध्यस्थी करून साखर कारखाने पैसे देतील, असे आश्वासन दिले होते. दोन महिने होत आले तरीही अद्याप अनेकांनी प्रस्ताव दाखल केला नाही. साखर कारखान्यांनी तातडीने दोन दिवसांत शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत अन्यथा. कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करू, असा इशारा त्यांनी दिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.