
निगेटिव्ह विचारांचे अदृश्य युद्ध देशाला घातक
डॉ. उदय निरगुडकर ः देशात कोणाचा कोणावर विश्वास राहिला नाही
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः देशात सुरू असलेले निगेटिव्ह विचारांचे अदृश्य युद्ध देशाला घातक आहे. देशाबद्दल नकारात्मकता पसरविली जात असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांनी व्यक्त केले. कोल्हापूर प्रेस क्लबमध्ये त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशात कोणाचा कोणावर विश्वास राहिलेला नाही. माध्यमांवर वाचक विश्वास ठेवत नाहीत, न्यायालयावर पक्षकारांचा विश्वास ठेवत नाही, पोलिसांवर जनतेचा विश्वास नाही, राजकरणावर कोणाचाच विश्वास नाही. मुलगा वडिलांवर विश्वास ठेवायला तयार नाही. मतदान करून काय होणार, हे करून काय होणार, ते करून काय होणार, अशी नकारात्मकता देशासाठी हानिकारक आहे. असे डॉ. निरगुडकर यांनी सांगितले.
सध्या युक्रेन आणि रशियात सुरू असलेले युद्ध मिसाईलमधून असल्याने ते दिसून येते. नकारात्मक विचारांचे युद्ध अदृश्य असते. त्याचा मोठा धोका आहे. ‘एआय’सारखे टुल्स युद्धात वापरले जात आहेत. बंकरमधून महिलांनी त्यांच्या देशात सुरक्षित एसएमएस केला, कॉल केला तर तो आयडेंटिफिकेशन होते. त्याच ठिकाणी हल्ला होतो. ही परिस्थिती बदलत चाललेली आहे. देशात ही राज्यघटना धोक्यात आहे, म्हणणेही नकारात्मकता आहे. नकारात्मकता काढून टाकली पाहिजे, असेही मत डॉ.निरगुडकर यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.