वारणानगर : कोल्हापूर व सांगली कार्यक्षेत्र असलेल्या येथील श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षीक निवडणूक वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. २१ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमित माळी यांनी आज जाहीर केले. नूतन संचालक मंडळात नवीन आठ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली.
श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या पंचावार्षिक निवडणुकीसाठी छाननी प्रक्रियेनंतर २१ जागासाठी ३६ उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. त्यामधील १५ जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे २१ जागांसाठी २१ उमेदवार राहिल्याने सन २०२२-२७ या सालाकरीताची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकरी अमित माळी यांनी जाहीर केले
बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ असे -
ऊस उत्पादक व्यक्ती सभासद्
गट क्रमांक १ -
विनय विलासराव कोरे (वारणानगर), सुभाष आनंदराव पाटील (कोडोली), सुभाष तुकाराम कणसे (सातवे)
गट क्रमांक -२
शहाजी भाऊसो पाटील (जुने पारगाव), उदयसिंह सर्जेराव पाटील (चावरे), प्रदीप नीलकंठ तोडकर (अंबप).
गट क्रमांक - ३
सुभाष आनंदराव पाटील (नागाव), सुभाष कृष्णा जाधव (घुणकी), रावसाहेब भाऊसाहेब पाटील (भादोले).
गट क्रमांक - ४
प्रतापराव बाळकृष्ण पाटील (शिगाव), संदिप गोविंदराव जाधव (येलूर), डॉ प्रताप बाजीराव पाटील (ऐतवडे खुर्द).
गट क्रमांक - ५
श्रीनिवास विश्वनाथ डोईजड (चिकुर्डे), विजय सुभाष पाटील (मांगले), शामराव बाबुराव पाटील (सागाव)
उत्पादक सहकारी संस्था गट - किशोर जयसिंग पाटील (कणेगाव)
अनुसूचित जाती-जनाती गट - विजय बळवत धनवडे (किणी)
इतर नागासवर्गीय गट - रवींद्र आनंदराव जाधव (बहिरेवाडी).
भटक्या विनुक्त जाती-जनाती गट- काकासो महादेव चव्हाण (भेंडवडे)
महिला राखीव गट - वैशाली सुरेश पाटील ,(कोडोली), रंजना प्रतापराव पाटील (कांदे) याची निवड झाली.
विद्यमान अध्यक्षा शोभाताई कोरे, विलासराव पाटील यांच्यासह पाच संचालक मयत आहेत. नवीन संचालक मंडळात या आठ नवीन चेहऱ्याना संधी देण्यात आली असून विद्यमान संचालकापैकी दिलीप पाटील (सातवे) व मंगल श्रीपती पाटील ( लाडेगाव) यांना वगळण्यात आले आहे. नविन संचालकामध्ये डॉ प्रतापराव बाजीराव पाटील, सुभाष तुकाराम कणसे, शहाजीराव भाऊसो पाटील, संदीप गोविदराव जाधव, विजय सुभाष पाटील, सौ. रंजना प्रतापराव पाटील, सौ. वैशाली सुरेश पाटील यांचा समावेश आहे.
वारणेत पुन्हा सुवर्णकाळ
गेल्या पाच वर्षाच वारणेने अडचणीचा काळ अनुभवला आहे. मगील हफ्ता मिळाला नाही, पुढे मिळणार की नाही याची श्वाश्वती नसतानाही केवळ माझा कारखाना टिकला पाहिजे या भावनेतून ऊस उत्पादक सभासदांनी वारणेत ऊस पाठवला. या विश्वासास पात्र राहून यापुढे अडचणींचा काळ संपला असून वारणेत पुन्हा सुवर्णकाळ आला आहे
- डॉ. विनय कोरे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.