बेळगाव : नव्याने सुरु करण्यात आलेल्या भाजी मार्केटमुळे एपीएमसी रोडवरील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. त्यामुळे, या ठिकाणी सिग्नल बसविण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेऊन प्रशासनाने याठिकाणी सिग्नल बसवले आहेत. सध्या सिग्नलची चाचणी घेतली जात आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सिग्नल सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे, या मार्गावरील वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होणार आहे.
हे पण वाचा - जन्म-मृत्यूदाखल्यासाठी पुन्हा टोकन
एपीएमसीत जिल्ह्यासह महाराष्ट्र व गोव्यातून शेतकरी व व्यापारी येत असतात. त्याचबरोबर आता नव्याने भाजी मार्केट सुरु झाल्याने गर्दीत वाढ झाली आहे. रोज वाहतुकीची कोंडी भेडसावत आहे. त्यामुळे, संगमेश्वरनगर चौकात सिग्नल बसवण्याची गरज होती. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी होत असल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याचा विचार करून या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. सिग्नल कार्यान्वित झाल्यास काही प्रमाणात कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. सिग्नल संगमेश्वरनगर चौकात बसविल्याने आझमनगर, एपीएमसी रोड करुन येणारी वाहतूक तसेच हनुमाननगर परिसरातून होणारी तसेच बेळगावकडून येणाऱ्या वाहतुकीला शिस्त लागणार आहे. हा सिग्नल कायमस्वरुपी सुरू ठेवावा अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.
हे पण वाचा - अतिथी शिक्षक मानधनाविनाच
स्मार्ट सिटीतून शहरात अनेक ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एपीएमसी रोडवर सिग्नल बसविण्यात आला आहे. सध्या त्याची चाचणी घेण्यात येत आहे. ती यशस्वी झाल्यानंतर तसेच रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सिग्नल कायमस्वरुपी सुरु करण्यात येईल, अशी माहिती उत्तर वाहतूक पोलीस ठाण्याचे निरीक्षक नंदिश्वर कुंभार यांनी दिली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.