Amitabh Bachchan Trolls Pakistan and Shoaib Akhtar After Asia Cup Win
esakal
आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय. तिलक वर्माची जबरदस्त खेळी हे क्रिकेटप्रेमीच्या जल्लोषाचं कारण ठरलय. 69 धावांनी नाबाद खेळी करत तिलकने भारताला विजय मिळवून दिला. परंतु यामध्ये चर्चेचा विषय ठरला तो अभिषेक शर्मा. त्याची सुद्धा जबरदस्त खेळी भारतीयाच्या जल्लोषाचं कारण ठरली. भारताच्या विजयानंतर ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जल्लोष साजरा केलाय. अशातच या सगळ्यात अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत आलीय.