

India needs stronger technology capabilities to match China.
Sakal
प्रज्वल रामटेके
पुणे : सैन्यदल आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत चीनच्या तुलनेत मागे असून, भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी केवळ सैन्यदलावर अवलंबून न राहता उद्योग, तंत्रज्ञ, प्रशासन आणि शिक्षण क्षेत्राने एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. भविष्यातील युद्धपद्धती आणि सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी समग्र विचार करण्याची नितांत गरज आहे, असा सूर शनिवारी ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये उमटला.