Vidhan Sabha 2019 : पुणे : ''मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभक्ती, सुशासन या पातळ्यांवर आघाडी घेतली असून देशात महाराष्ट्राची कामगिरी चांगली आहे.'' असे मत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. पुणे दौरा निमित्ताने आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंकजा मुंडेंच्या सभेत गोंधळ घालणारे कार्यकर्ते भाजपचेच |
''निवडणुकीतही काँग्रेसचे कॅम्पेन ‘टेक ऑफ’ होत नाही. राहुल गांधी तर, परदेशात गेले होते. आता महाराष्ट्रात येत आहेत'' असे सांगत त्यांनी राहूल गांधी आणि काँग्रेसची खिल्ली उडवली. तसेच कलम ३७० च्या मुद्दयावरून रविशंकर यांनी काँग्रेसवर टीका केली.
'Vidhan Sabha 2019 : लालू प्रसाद यादवांना जेलमध्ये पाठवणारा मीच : रवीशंकर प्रसाद
'देशातील लोकांचा भाजप सरकारवर विश्वास आहे, त्याच्या बळावर सरकार कामे करीत आहे. पुणे शहरात सर्व स्मार्ट सेवा-सुविधा उभारण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. विशेषतः आयटी क्षेत्र विस्तारत आहोत.''असेही त्यांनी यावेळी सांगितले.
"Vidhan Sabha 2019 : अमित शहांच्या रॅलीसाठी पोलिसांचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.