Pune : प्रतिज्ञापत्र न देणाऱ्या अडत्यांवर बाजार समितीची मोठी कारवाई; 1 लाख 38 हजार रुपयांचा दंड वसुल

बाजार समितीने दोनदा मुदत दिल्यानंतरही केवळ 18 अडत्यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते.
Pune
PuneSakal

मार्केट यार्ड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ, भाजीपाला विभागातील अडत्यांवर बाजार समिती प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी (ता. १) समितीने 116 डमींवर (मदतनीस) कारवाई करत जीएसटीसह 1 लाख 38 हजार 880 रुपये दंड वसुल केला.

बाजार समितीने दोनदा मुदत दिल्यानंतरही केवळ 18 अडत्यांनी प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र, मंगळवारी (ता.1) कारवाईचा बडगा उगारताच अडत्यांनी बाजार समितीकडे प्रतिज्ञापत्र देण्यास सुरूवात केली. दिवसभरात तब्बल 78 जणांनी प्रतिज्ञापत्र दिले.

Pune
Pune : नरेंद्र मोदींनी घेतली माजी आमदार लेले यांच्या कुटुंबीयांची भेट

आतापर्यंत बाजार समितीकडे 96 प्रतिज्ञापत्र देण्यात आली आहे. उद्या (बुधवार ता. 2) मोठ्या संख्येने अडते प्रतिज्ञापत्र देतील, असा अंदाज विभाग प्रमुख महेंद्र काळभोर यांनी वर्तविला आहे.

प्रतिज्ञापत्र न देणाऱ्या अडत्यांवर बाजार समितीची कारवाई सुरू राहणार आहे. मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभागात डमी अडत्यांचा सुळसुळाट झाला आहे. अडत्यांकडून शेतमाल खरेदी करून डमींकडून त्याची दुबार विक्री होत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कमी भाव मिळत आहे.

Pune
Jaipur-Mumbai Exp Firing: रेल्वेतील गोळीबारात मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबियांना २५ लाखांची नुकसान भरपाई

या परिस्थिती नवनिर्वाचित संचालक मंडळाने एका गाळ्यावर दोन मदतनीस ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र 500 रुपयांच्या स्टॅम्पवर देण्याच्या सुचना अडत्यांना दिल्या आहेत. यास अडत्यांनी विरोध केला.

सुरूवातील बाजार समितीने दिलेल्या (ता. १६) जुलैपर्यंत एकाही अडत्याने प्रतिज्ञापत्र दिले नाही. त्यानंतर अडते असोसिशनच्या सुचनेनुसार 31 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र देण्यास मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीतही केवळ 18 अडत्यांनीच प्रतिज्ञापत्र दिले होते. या पार्श्‍वभूमीवर बाजार समितीने हे कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

बाजार समितीच्या सुचनेनुसार प्रतिज्ञापत्र न दिलेल्या 116 अडते, मतदनिस यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बाजार समिती ही कारवाई सुरूच ठेवणार आहे. ज्या अडत्यांच्या गाळ्यावर मदतनीस आहेत. त्यांनी प्रतिज्ञापत्र देणे अनिवार्य आहे. यामुळे अडते आणि शेतकऱ्यांच्याच फायदा होणार आहे.

- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे

व्यापारी-अडते गटातील संचालकांचे प्रतिज्ञापत्र जमा

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी-अडते गटातून निवडून आलेले गणेश घुले आणि अनिरुद्ध (बापू) भोसले या दोन्ही संचालकांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे उर्वरित अडते यांनी देखील प्रतिज्ञापत्र देण्यास सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com