फोन टॅपींग प्रकरणी IPS अधिकारी रश्‍मी शुक्‍ला यांचा जबाब नोंदविणार

पटोले, बच्चु कडू, काकडे, देशमुख यांचे तब्बल 60 दिवस फोन टॅप
Rashmi Shukla
Rashmi Shuklaesakal

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेससह विविध राजकीय पक्षांमधील महत्वाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे अभिवेक्षण (फोन टॅपींग) केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदविला जाणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चु कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे तब्बल साठ दिवस फोन टॅप केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Rashmi Shukla
Pune Corporation: गणेश बीडकर यांचे सभागृहनेतेपद रद्द

शुक्‍ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप -सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी महाराष्ट्र विधीमंडळाच्या 2021 च्या अधिवेशनामध्ये 2015 ते 2019 या पाच वर्षाच्या कालावधीमधील संपुर्ण फोन टॅपींग प्रकरणी प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्च समितीच्या अहवाल शासनाला प्राप्त झाला. त्यामध्ये अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनीधींचे फोन गैरपद्धतीने टॅप करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार, 26 फेब्रुवारी रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्यात शुक्‍ला यांच्यासह इतर संबंधित व्यक्तींवर भारतीय तार अधिनीयम कायदा कलम 26 प्रमाणे बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी फिर्याद दिली असून गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Rashmi Shukla
Pune-Nashik Railway: सेमी हायस्पीड रेल्वे ४ वर्षांत धावणार

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून पुढील कारवाई काय केली जाणार आहे, याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना विचारण्यात आले. त्यावेळी संबंधित प्रकरणाचा तपास संबंधित तपासी अंमलदार करीत आहेत. त्यांच्याकडून या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींचा जबाब नोंदविला जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.

* नेत्यांचे 60 दिवस फोन टॅप

पटोले, बच्चु कडू, आशिष देशमुख या तिघांना विशिष्ट नावांचा वापर करुन 18 सप्टेंबर ते 14 नोव्हेंबर 2017 या 60 दिवसांच्या कालावधीत फोन टॅप करण्यात आला. त्यासाठी विशिष्ट नावांचा कोडनेम वापरण्यात आला होता. संबंधित व्यक्तींचा पुणे शहरातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ पुरविण्यात हात असल्याचे नमूद करण्यात आले होते. नेत्यांचे फोन टॅप करताना त्यांच्या नावांसाठी कोडनेम वापरण्यात आले होते. तर संजय काकडे यांचे कुख्यात बापू नायर टोळीशी संबंध असल्याचे सांगून त्यादृष्टीने त्यांचेही फोन 60 दिवस टॅप करण्यात आले होते. काकडे यांच्यासाठी नायर टोळीतील अभिजीत नायर या गुंडाच्या नावाचा कोडनेम वापरण्यात आला होता.

* फोन टॅपींगचे अर्ज आवेदन पत्र वरती पोचलेच नाही

पुणे पोलिस आयुक्त असताना शुक्‍ला यांनी नेत्यांच्या फोन टॅपींगसाठी परवानगी घेताना ग्राहक अर्ज आवेदन पत्र (सीएएफ) गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना सादर करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात त्यांनी संबंधित पत्रच सादर केले नसल्याचेही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

* तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले

फोन टॅपींगच्या प्रकरणामध्ये तत्कालीन अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्‍यता आहे. शुक्‍ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना याप्रकरणामध्ये मदत करणाऱ्या संबंधित पोलिस अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com