Insurance Policy: विमा पॉलिसी म्हणजे काय? भारतातील विम्याचा इतिहास कधी आणि कसा सुरू झाला?

भारतातील विम्याचा इतिहास कधी आणि कसा सुरू झाला याविषयी जाणून घेऊया.
History Of Insurance Policy In India
History Of Insurance Policy In IndiaSakal

History Of Insurance Policy In India: 'आयुर्विम्याला पर्याय नाही,' हे घोषवाक्‍य आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. विविध विमा कंपन्यांच्या वेगवेगळ्या विमा योजनांच्या जाहिरातीही आपण वाचत असतो; पण हा विमा म्हणजे नेमकं असतं काय, भारतातील विम्याचा इतिहास कधी आणि कसा सुरू झाला याविषयी जाणून घेऊया. 

विमा हा एक शब्द आहे, जो ऐकून तुमची भीती दूर होते. दुसऱ्या शब्दांत, विमा कंपन्यांनी तुमच्या भीतीला व्यवसाय बनवले आहे. या विम्याद्वारे तुम्हाला आणि विमा कंपन्यांना दोघांनाही फायदा होतो.

जीवनातील कोणतीही अनपेक्षित परिस्थिती तुमच्या कुटुंबाच्या आनंदाला बाधा आणू शकते. भारतात विविध प्रकारच्या जीवन, आरोग्य आणि सामान्य विमा पॉलिसी उपलब्ध आहेत. पण, देशात किती प्रकारचे विमा अस्तित्वात आहेत याचा तुम्ही विचार केला आहे का. या प्रश्नांची उत्तरे सोप्या शब्दात जाणून घेऊया.

भारतातील पहिली विमा कंपनी ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स होती. कलकत्ता (सध्याचे कोलकाता) येथे 1818 मध्ये त्याची स्थापना झाली. ही कंपनी 1834 मध्ये दिवाळखोर झाली.

सुमारे पाच वर्षांनंतर, 1823 मध्ये, देशाला त्यांची दुसरी विमा कंपनी, बॉम्बे लाइफ अॅश्युरन्स कंपनी मिळाली. यानंतर 1829 मध्ये मद्रास इक्विटेबल गॅरेंटर कंपनी सुरू झाली.

1914 मध्ये, भारत सरकारने भारतातील विमा कंपन्यांचे विवरण प्रकाशित करण्यास सुरुवात केली. लाइफ इन्शुरन्स कंपनीज ऑफ इंडिया कायदा, 1912 हा जीवन व्यवसायाचे नियमन करण्यासाठी पहिला वैधानिक कायदा होता.

एलआयसीची 1956 मध्ये सुरुवात:

19 जानेवारी 1956 रोजी जीवन विमा क्षेत्राचे राष्ट्रीयीकरण करणारा अध्यादेश जारी करण्यात आला आणि त्याच वर्षी आयुर्विमा महामंडळ अस्तित्वात आले.

LIC ने 154 भारतीय, 16 गैर-भारतीय विमा कंपन्या तसेच 75 भविष्य निर्वाह संस्था, 245 भारतीय आणि परदेशी विमा कंपन्या समाविष्ट केल्या आहेत. 90 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत एलआयसीची मक्तेदारी होती, जेव्हा विमा क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी पुन्हा उघडण्यात आले.

History Of Insurance Policy In India
Population Policy: 2 किंवा जास्त मुलांना जन्म दिल्यावर मिळणार पगारवाढ, 'या' राज्याने केली घोषणा

विम्याचे किती प्रकार आहे?

तुम्ही आजपर्यंत अनेक प्रकारच्या विम्याबद्दल ऐकले असेल, विम्याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत - पहिला सामान्य विमा आणि दुसरा जीवन विमा.

सामान्य विमा

सामान्य विमा पॉलिसी हा विम्याच्या प्रकारांपैकी एक आहे जो पॉलिसीधारकाच्या मृत्यूशिवाय इतर नुकसानीसाठी विम्याच्या रकमेच्या स्वरूपात कव्हरेज प्रदान करतो.

एकूणच, सामान्य विम्यात विविध प्रकारच्या विमा पॉलिसींचा समावेश होतो जसे की बाईक, कार, घर, आरोग्य इ. ते उत्तरदायित्वामुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देतात. सामान्य विम्यामध्ये तुम्हाला आरोग्य विमा, मोटर विमा, गृह विमा, अग्नि विमा, प्रवास विमा मिळतो.

जीवन विमा

जीवन विमा योजना पॉलिसीधारकाचा मृत्यू किंवा अपंगत्व यासारख्या दुर्दैवी घटनांसाठी कव्हरेज प्रदान करतात. आर्थिक सुरक्षेव्यतिरिक्त, विविध प्रकारच्या जीवन विमा पॉलिसी आहेत.

लाइफ इन्शुरन्समध्येच तुम्हाला टर्म लाइफ इन्शुरन्स, संपूर्ण लाइफ इन्शुरन्स, एंडोमेंट प्लॅन्स, युनिट-लिंक्ड इन्शुरन्स प्लान, चाइल्ड प्लान, पेन्शन प्लॅन मिळतात.

History Of Insurance Policy In India
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com