Share Market: शेअर बाजारातील गोंधळावर निर्मला सीतारामन यांचे मोठे वक्तव्य, भाजपच्या कमबॅकवर काय म्हणाल्या?

Share Market Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, बाजार आणि गुंतवणूकदारांनी काळजी करण्याची गरज नाही.
Nirmala Sitharaman on Share Market Volatility, says bjp is coming back with good numbers
Nirmala Sitharaman on Share Market Volatility, says bjp is coming back with good numbers Sakal

Share Market Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेअर मार्केटमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेवर भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या की, बाजार आणि गुंतवणूकदारांनी काळजी करण्याची गरज नाही. शेअर बाजार धोरणात्मक स्थिरता, कर स्थिरता आणि निश्चिततेवर चालतो. त्या म्हणाल्या की, भाजप पुन्हा चांगल्या संख्येने सत्तेत येणार आहे यात शंका नाही.

निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मला पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळाबद्दल पूर्ण विश्वास आहे. त्या म्हणाल्या की, चांगल्या आर्थिक बाजारपेठेसाठी स्थिरता आवश्यक आहे, जी पंतप्रधान मोदी देतील. त्यांच्या मते भारतीय शेअर बाजाराने कल्पनेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

जगातील बहुतांश बाजारपेठांमध्ये अनिश्चितता आहे, मात्र भारतात चांगली कामगिरी दिसून येत आहे. वाढीचा अंदाज खूप चांगला आहे, महागाईचा दर कमी आहे, गुंतवणूकदारांना भारतात यायचे आहे आणि भारतीय बाजारपेठेत तंत्रज्ञानाचा चांगला वापर केला जात आहे.

Nirmala Sitharaman on Share Market Volatility, says bjp is coming back with good numbers
Artificial intelligence: आपल्याकडे खूपच कमी वेळ उरलाय... एआयवर IMF प्रमुखांनी केली मोठी भविष्यवाणी

अर्थमंत्री म्हणाल्या की, परदेशी बाजारपेठेतील लोक T+0 सारख्या प्रणालीची कल्पना करू शकत नाहीत. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे भारतीय बाजारपेठेत कार्यक्षमता वाढली आहे. MSCI निर्देशांकात भारताचा वाटा दुप्पट होऊन सुमारे 14% झाला आहे, जो पूर्वी सुमारे 6% होता.

काँग्रेसच्या संपत्ती पुनर्वितरण योजनेबद्दल अर्थमंत्री म्हणाल्या की, काँग्रेसच्या संपत्ती पुनर्वितरण धोरणामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था बिघडेल. कारण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यावसायिकाला पुढे जायचे आहे.

Nirmala Sitharaman on Share Market Volatility, says bjp is coming back with good numbers
SEBI KYC: कोट्यवधी गुंतवणूकदारांना दिलासा; सेबीने KYC संबंधित नियम केले शिथिल, कोणाला होणार फायदा?

PSU बँकांच्या निर्गुंतवणुकीबाबत त्या म्हणाल्या की, योजनेत कोणताही बदल नाही, कॅबिनेट योजनेला मंजुरी दिली आहे. मात्र, पुढे काय करायचे ते येणारा काळच ठरवेल. यासाठी संस्थांनीही तयार राहावे अशी आमची इच्छा आहे, परंतु मूल्यांकनात कोणतीही घट होणार नाही याची खात्री आहे. जमीन आणि कामगार सुधारणांबाबत निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, अनेक लोकांशी चर्चा करावी लागेल. जोपर्यंत चर्चा पूर्ण होत नाही तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com