asia cup cricket competition win india
sakal
आशिया करंडक सामन्यांतून जाणवला तो भारतीय संघाचा आत्मविश्वास. मैदानावरील आणि मैदानाबाहेरील कामगिरीतून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर भारताने दिले.
हमसे है ज़माना... ज़माने से हम नहीं, हम अपनी शर्तों पर खेलते हैं... और जीतते भी हैं।
या पंक्तींचा भावार्थ दुबईत झालेल्या ‘आशिया क्रिकेट स्पर्धे’त भारतीय संघाने केलेल्या कामगिरीशी मिळताजुळता आहे. आव्हानवीर असल्याचा आव आणून आणि वल्गना करून बेटकुळ्या काढण्याचा प्रयत्न पाकिस्तानी संघाने केला, तरी भारताने एकदा नव्हे तर तीनदा त्यांना भुईसपाट करून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.