श्री गणरायाचे आगमन झाले आहे. मूषकावर स्वार होवोनि गणनायक घरोघर अवतरले आहेत. सर्वांचे क्षेम करणार आहेत. अवघा आनंदीआनंद आहे. महाराष्ट्रातील काही सुप्रसिद्ध भक्तांनी श्रीगणरायाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा करोन आपल्या आप्तांस घरी तीर्थप्रसादास बोलावले. काही स्वत:च उठून आप्तांच्या घरी गेले! काही २१ घरी जाऊन यायच्या तयारीने निघाले.