वाहतूक कोंडी : सर्वांचे सहकार्य आवश्यक

K C Pandey with students
K C Pandey with studentsesakal
Updated on

लेखक : के. सी. पांडे

रस्ते अथवा महामार्ग ही देशाची ओळख असते. मग ते कोणतेही राज्य अथवा शहर असो. ते किती विकसित आहे, हे त्या ठिकाणच्या रस्त्यावरून लक्षात येते. रस्ते व महामार्ग टिकविणे, त्याची काळजी घेणे. शासनाबरोबरच सर्व नागरिकांचीही जबाबदारी आहे. आपण त्याचा वापर कसा करत आहे, यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. शासन रस्ते तयार करतात व टिकवण्यासाठी प्रयत्नही केले जातात.

महामार्गांच्या निर्मितीनंतर दोन शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे वेअर हाउस उभारले गेले आहेत. यामुळे वाहतुकीत प्रचंड अडथळा निर्माण होतो. उदाहरणार्थ- मुंबई-भिवंडी रस्त्यावर महामार्ग तयार झाल्यानंतर निर्माण झालेल्या वेअर हाउसमुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा आपण कायमच अनुभवतो, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाच्या वरिष्ठ विभागाने समन्वय साधला पाहिजे. (saptarang Latest Marathi Article by KC Pandey nashik news)

K C Pandey with students
संगीतकार शिकून होत नसतो
esakal

गारगोटीसारखा उद्योग मी निर्माण केला, त्या वेळी बदलाची सुरवात स्वतःपासून केली. लोक बदलतील, शासन निर्णय घेईल हे करण्यापेक्षा आपण आपले निर्णय घ्यावेत. प्रथम आपल्यात बदल करावा आणि तो मी केला, त्यात यशस्वीही झालो. सकाळच्या प्रहरी अथवा सायंकाळी लोक ‘वॉकिंग’साठी अथवा सायकलिंगसाठी बाहेर पडतात, त्या वेळी रस्त्याचा अंदाज घेत नाही. वाहतुकीकडे दुर्लक्ष करून ‘वॉकिंग’ करीत असतात.

त्या वेळी प्रामुख्याने रिफ्लेक्टर असलेले टी-शर्ट रस्त्याच्या कडेने चालले हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अपघात टाळले जातात. मुंबई ही राज्याची राजधानी, तर आहेच; परंतु देशाचीही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे या मुंबईत येणारी वाहतुकीचे फेरनियोजन आवश्यक आहे. ठराविक ठिकाणीच मुंबईकडे जाताना तासन् तास वाहतुकीत अडथळा निर्माण होत असतो. ‘ट्रॉफिक जाम’ हे मुंबईला जाताना जणू काही समीकरणच बनलं आहे, हे बदललं पाहिजे. यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.

लोकप्रतिनिधी अथवा शासकीय अधिकारी अनेकदा बाहेरच्या देशात इन्फ्रास्ट्रक्चर बघण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी दौरे काढतात. त्यात तज्ज्ञांचीही समावेश असतो; पण यात अधिक सुधारणा आवश्यक आहे. दौरा झाला, सूचना मांडल्या, इतकेच साध्य यामधून होत; पण त्या अभ्यास दौऱ्याचे फलित काय आहे, याचे मूल्यमापन झाले पाहिजे. त्या दौऱ्यातून मिळालेल्या काही सूचना प्रत्यक्षात आपल्याकडे राबविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. अलीकडे देशात आश्वासक नेतृत्व बघायला मिळत आहे.

नागरिकांनीही त्यासाठी योगदान दिले पाहिजे. महामार्ग तयार होत असताना त्यासाठी नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे. दुर्दैवाने हे चित्र सध्या बघावयास मिळत नाही, त्यास प्रचंड विरोध होतो. वेळप्रसंगी हिंसक वातावरणही निर्माण होते. विकास हा सर्वांसाठीच होणार आहे. महामार्ग झाल्यानंतर त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. महामार्गाबरोबरच रस्ते सुधारण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा प्रशासनाने जागरूकता दाखवली पाहिजे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

K C Pandey with students
कथा अरुणाच्या अंत्यसंस्काराची
esakal

जगातील एकमेव गारगोटी आंतरराष्ट्रीय संग्रहालय जगभरात प्रसिद्ध आहे. देश-परदेशातून लोक भेट देण्यासाठी नियमितपणे तेथे येतात. तरीही सिन्नर एमआयडीसीतील रस्त्यांची दुरवस्था ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. यामध्येही सुधारणा झाली पाहिजे. वाहतूक समस्या सुटेल, त्याचबरोबर आर्थिक विकासही निश्चित होतो. वेळेची बचत, इंधन खर्चात कपात, तत्काळ सेवा यामुळे वाढणारा वाहतुकीचा खर्च कमी होऊन त्याचा विनियोग योग्य ठिकाणी होतो. त्यातून रोजगारनिर्मितीच्या संधी आहेत.

आपण आपल्या हक्कांबद्दल नेहमीच जागरूक असतो. पण कर्तव्याची जेव्हा आपल्यावर पाळी येते, तेव्हा आपण मागे हटतो, असे चित्र समाजात सगळीकडे बघायलास मिळते. ही बाब अत्यंत चुकीची आहे. जो समाज, जो देश आपल्याला ओळख आहे. तेथील पालक संस्थेने म्हणजेच शासनाने दिलेले नियमावलींचे आपण आपले कर्तव्य समजून पालन केले पाहिजे.

गारगोटीसारखा प्रकल्प उभारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण कर्तव्य बजावताना विशेष करून समाज अथवा शासनाप्रति मी कधीही तडजोड केली नाही. त्यासाठी कदाचित मला नुकसान सहन करावे लागले. पण माझ्या ध्येयापासून मी कधीही हटलो नाही. कर्तव्य पालनचा जेव्हा विषय येतो, तेव्हा सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे कायदा व सुव्यवस्था. जिल्हा प्रशासन अथवा पोलिस प्रशासन यांनी निर्देशित केलेले नियम आपल्या हितासाठीच आहेत.

त्यामुळे आपलेच प्राण वाचणार आहेत, याचे तंतोतंत पालन केले पाहिजे. दुर्दैवाने आपल्या देशात वाहतुकीचे नियम पाळताना प्रचंड प्रमाणात उदासीनता आहे, ती सर्वच पातळ्यांवर आहे. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीचे नियम पालन न करण्यामध्ये सुशिक्षित वर्गाचे प्रमाण अधिक आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. वाहन चालविताना विविध नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. वेगावर नियंत्रण, योग्य दिशेने वाहन चालविणे. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही अथवा इजा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

K C Pandey with students
निसर्गचक्र

घरातील एखादा कर्ता व्यक्ती आणि उमेदीच्या काळातील एखादी व्यक्ती घरातून हसतखेळत बाहेर पडते. कामावर जाण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे स्वतः अथवा इतरांनी केलेल्या चुकीमुळे मोठा अपघात होतो. एका आजारापेक्षाही त्या कुटुंबीयांसाठी ही परिस्थिती भयंकर असते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होते, असे घडू नये म्हणून प्रशासन ठिकठिकाणी बोर्ड, गतिरोधक, सिग्नल, झेब्रा पट्टे आदी धोक्याची सूचना देणारे फलक लावलेले असतात. पण नागरिक त्यास दाद देत नाहीत.

लोकसंख्येचे प्रमाण व उपलब्ध असलेली पोलिस प्रशासनाची संख्या यात प्रचंड तफावत आहे. पोलिस प्रशासन प्रत्येकामागे एक कर्मचारी ठेवू शकत नाही. त्यांच्याकडून कधी दंडात्मक, तर कधी सौम्य अथवा कठोर प्रकारची कारवाई होतेच; पण ती कारवाई करण्याची गरजच नाही पडली पाहिजे. स्वयंस्फूर्तीने आपण नियमांचे पालन केले पाहिजे. वेगावर नियंत्रण आणण्यासाठी शासन गतिरोधक, अथवा दंड करू शकते, पण प्रत्येकाच्या वाहनात बसून वेग कमी करू शकत नाही. हेल्मेट न घातल्यास कारवाई करू शकते, पण प्रत्येकाच्या डोक्यात हेल्मेट घालू शकत नाही. या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.

अनेक वर्षांपासून नियमितपणे गारगोटीसाठी अमेरिकासारख्या देशात जात आहे. तेथे व आपल्या येथील परिस्थितीत फार फरक आहे. नियमांचे पालन केले जाते. आपल्याकडे नियमांचे पालन न करणे यात शौर्य समजले जाते. सर्व जर व्यवस्थितपणे अथवा सुरळीतपणे सुरू ठेवायचे असेल, तर शासनाबरोबरच लोकसहभागी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठीसुद्धा शासनाबरोबर पुढे आले पाहिजे.

K C Pandey with students
काही आंबट, काही गोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com