फडणवीस म्हणतात.. "सुशांत सिंह प्रकरणी मुंबई पोलिसांचे काम चांगलेच...परंतु..."

Devendra-Fadnavis-Sushant-Singh-Rajput.jpg
Devendra-Fadnavis-Sushant-Singh-Rajput.jpg

नाशिक : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून वाद सुरु आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, मुंबई पोलिसांवर कुठलाचं आरोप नाही. पोलीस चांगले काम करतं आहे. परंतू राजकीय दबावामुळे पोलिसांच्या कामा मध्ये खंड पडू शकतो असे सांगताना त्यांनी राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशय व्यक्त केला.

मुंबई पोलिसांचे काम चांगले 

बिहार पोलिस तपासासाठी आले असले तरी त्यांना तपास करू देण्याचा सल्ला देताना बिहारच्या पोलिस अधिकायांना कोरोंटाईन का केलं असा सवाल उपस्थित केला. सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास मुंबई कि बिहार पोलिसांनी करावा हे सुप्रिम कोर्ट ठरवेल. या प्रकरणात महाराष्ट्र सरकारवर निर्माण झालेला संशय दुर करून जनभावनेचा आदर करण्याची मागणी त्यांनी केली. अमृता फडणवीस यांनी केलेलं सुशांत वर केलेल्या ट्विटचा गैरअर्थ काढू नये असे सांगताना या प्नकरणात लोकांना उत्तर द्यावे, आम्हाला राजकारण करायचं नाही. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटला आम्ही उत्तर देव शकतो परंतू त्यात काही अर्थ नसल्याचे ते म्हणाले. 

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com