शेतकऱ्यांना पीकविमा योजनेपासून अपात्र करण्याचा कंपनीचा सपाटा; शेतकऱ्यांमध्ये संताप

farmer 3.jpg
farmer 3.jpg

नाशिक/घोटी : परतीच्या पावसाने जिल्ह्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान केले आहे. प्रधानमंत्री पीकविमा नियुक्त कंपन्यांकडून शेताची अर्धवट पाहणी करून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेपासून अपात्र ठरविण्याचा धडाका सुरू असल्याची तक्रार शेतकरी संघटनेने केली. याबाबत गुरुवारी (ता. ५) इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांना शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. 

शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा कंपनीचा सपाटा

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हा परिसर भौगलिकदृष्ट्या अत्यंत दुर्गम आहे. भातपीक येथील प्रमुख पीक आहे. यंदा अवकाळी पावसाने भातपिकाला मोठा दणका दिला. शेतकऱ्यांनी अवकाळी पावसापासून पिकांच्या होणाऱ्या नासाडीतून बचाव करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीत प्रधानमंत्री विमा योजनेत सहभागी होत पैसे भरले. मात्र विमा कंपन्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अपात्र करण्याचा सपाटा लावला आहे. विविध क्लुप्त्या लढवून शेतकऱ्यांना अपात्र ठरविले जात असल्याचा धडका सुरू आहे. भातपिकांच्या अतोनात नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी तातडीने विमा कंपन्यांना कळवले. मात्र, पंचनामा करण्यासाठी वेळेत कोणीही अधिकारी फिरकला नाही. विमा कंपनीने दिलेल्या ॲपवर आदिवासी शेतकऱ्यांना माहिती भरता आली नाही. 

लाइव्ह फोटो लोकेशन इंटरनेटअभावी माहिती भरू शकले नाही. या सगळ्याचा आधार घेत, कंपन्यांकडून शेतकरी अपात्र ठरवले जात असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ, तालुकाध्यक्ष किसान शिंदे, अरुण भागडे, दत्ता शिंदे, दत्तू जाधव, रामदास भागडे, दत्तू मते, शिवराम कुलाळ आदींनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com