कांदा दर निश्चितीसाठी शेतकऱ्यांची एकजूट हवी - भारत दिघोळे

bharat dighole.jpg
bharat dighole.jpg

नाशिक : (सिन्नर) आतापर्यंत कोणीही कांदा उत्पादक शेतकऱ्याची दखल घेतली नाही. परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना एकजुटीने लढा देईल असे आश्वासन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिले.

राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या मेळाव्यात आवाहन

तालुक्यातील खडांगळी येथे संघटनेच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संवाद मेळावा दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच पार पडला. यावेळी माजी उपसरपंच केशव कोकाटे, युवा संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक खुळे, रंगनाथ कोकाटे, सुनील ठोक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. दिघोळे यांनी शेतकऱ्यांना कांदा बियाणे टाकण्यापासून ते विक्री करण्यापर्यंत येत असलेल्या समस्या व त्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेला आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास समजावून सांगितला. ज्या शेतकऱ्यांना कांद्याची लागवड करायची असेल त्यांनी आता बियाणे स्वतःच्या घरी तयार केले पाहिजे. 

बोगस बियाणे खरेदी

अनेक शेतकऱ्यांची बियाणांमध्ये फसवणूक झाली असून अव्वाच्या सव्वा दरात शेतकऱ्यांनी बोगस बियाणे खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. मेळाव्यात सुनील बारकू ठोक यांची राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानिमित्त दिघोळे यांच्या हस्ते ठोक यांचा सत्कार करण्यात आला. कैलास ठोक, राजेंद्र कोकाटे, गिरीश ठोक, गोरख कोकाटे, लक्ष्मण कोकाटे, बाबुराव ठोक, गोपाळ ठोक, गणेश कोकाटे, दीपक खुळे, गणेश ठोक, योगेश ठोक, सोमनाथ कोकाटे, सुरेश खुळे, संजय खुळे, केशव भोकनळ, ज्ञानेश्वर भोकनळ आदींसह परिसरातील शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com