हिंगणघाटसारख्या घटनांना तिलांजली देऊया..! 

taniska jalgon meeting
taniska jalgon meeting

जळगाव : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याने सरकारने केलेल्या महिला सुरक्षेच्या योजना व कायदे तोकडे पडत आहेत. हिंगणघाट येथे प्राध्यापिकेस जिवंत जाळल्याच्या प्रकरणाने समाजमन सुन्न झालेले असताना आता अशा घटनांना तिलांजली देण्याचा संकल्प "सकाळ- तनिष्कां'नी केला आहे. स्त्रीची प्रतिष्ठा जपण्याची मोहीम हाती घेण्याचा निर्धार करत बुधवारी पहिल्याच दिवशी "सकाळ'च्या शहर कार्यालयात एकत्रित आलेल्या बारी समाज मंडळाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी हा संकल्प केला. 

हिंगणघाट येथे 3 फेब्रुवारीला एकतर्फी प्रेमातून प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. त्यामुळे समाजात प्रचंड क्षोभ उसळला आहे. 


"तनिष्का'चा प्रयत्न 
या पार्श्वभूमीवर सकाळ तनिष्का व्यासपीठाच्या वतीने या सामाजिक प्रश्नाचे भान राखत "प्रतिष्ठा जपूया' हा दृढ संकल्प करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये महिला सुरक्षेच्या प्रश्नाबाबत पुढाकार घेत "प्रतिष्ठा जपूया..' ही आत्मभान जागृत करणारी मोहीम पुढील काळात राबविण्यात येणार आहे. 

बारी समाज महिलांचा पुढाकार 
याच पार्श्वभूमीवर शहरातील बारी महिला मंडळातील प्रमुख सदस्यांच्या उपस्थित सकाळ शहर कार्यालयात बुधवारी दुपारी बाराला बैठक घेण्यात आली. यावेळी जळगाव महापालिका महिला बालकल्याण सभापती शोभा बारी, खुशी बारी, इंदू फुसे, कल्पना बारी, सीमा कोल्हे, सुरेखा बारी, एकता बारी, पूनम बारी, उज्ज्वला बारी, संगीता बारी, दीप्ती बारी, स्मितल सातपुते, सोनाली बारी, आरती बारी या मंडळातील प्रमुख सदस्यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी बारी युवा प्रकोष्ठ मंडळातील उपक्रमशील सदस्य अतुल बारी, मनोज बारी, सुनील बारी, भरत बारी, प्रवीण बारी, हर्षल बारी, राजेंद्र बारी हेदेखील उपस्थित होते. 

सरकारची जबाबदारी अधिक 
सरकार कोणतेही असो महिला मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची असल्याने कठोर शिक्षेची तरतूद करून उपाययोजना करण्यात यावी 
तसेच अशा विकृत घटना टाळण्यासाठी सामाजिक प्रबोधन व्हावे अन्यथा नुसत्याच चर्चा घडत राहून प्रत्यक्षात मात्र काही होणार नाही, असे मत यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले. या घटनांमुळे भावनांचा उद्रेक होऊन जनप्रक्षोभ उसळणे साहजिक आहे. यासाठी दिशा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी राज्यात होणे गरजेचे असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. सोशल मीडिया व इंटरनेटचा अतिरेकी वापर व भडक जाहिरातींमधून पेरण्यात येणारे अशोभनीय संदेश संस्कारांच्या अभावामुळेच समाजात दिवसेंदिवस अमानवीय कृत्य घडत असल्याचे सामाजिक निरीक्षण सदस्यांच्या वतीने नोंदविण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com