Nashik Crime: पालकांनो सावधान! शहरात 20 दिवसात 16 मुलींचे अपहरण; नियमित संवादाची गरज

Abduction of girl
Abduction of girlesakal

Nashik Crime : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून गेल्या २० दिवसांमध्ये तब्बल १६ मुलींचे अपहरण झाल्याची नोंद शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये करण्यात आलेली आहे. प्रेम प्रकरणांतून मुली घर सोडून वा त्यांना आमिष दाखवून त्यांचे अपहरण झाले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यासंदर्भात पोलिसांकडून तपास केला जात आहे.

ओळखीच्या माध्यमातून तर कधी शाळा-महाविद्यालयांमध्ये मुले-मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात. तर कधी मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांना तरुणांकडून भुलविले जाते.

यातून मुली घरांमध्ये काहीतरी बहाणा करून घराबाहेर पडतात, तर कधी घरात कोणालाही काहीही न सांगता घर सोडून निघून जातात. (16 girls abducted in 20 days in city nashik crime news)

मुलगी घरात परतली नाही, त्यामुळे पालक मुलीचा शोध सुरू करतात. कुठेही तिचा थांगपत्ता न लागल्यास ते पोलिसांकडे धाव घेतात. पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल होतात. पोलिस तपासातून बहुतांशी मुली या प्रेम प्रकरणातूनच स्वतःहून घर सोडून गेल्याचे समोर येते.

नोव्हेंबरमध्ये शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून २० दिवसांमध्ये १६ मुलींचे अपहरण झालेले आहे. या अपहरण झालेल्या मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीमध्ये, त्यांना कोणीतरी आमिष दाखवून तर काही मुली या घरात बहाणा करून वा काहीही न सांगता निघून गेल्याचे कारण दिलेले आहे.

यासंदर्भात पोलिसांच्या विशेष पथकांकडून मुलींचा शोध घेतला जात आहे. परंतु, काही प्रकरणांमध्ये मुली सज्ञान असल्याचे निष्पन्न होत असल्याने मुलीच घरी परत येणार नसल्याचे सांगतात. तर अल्पवयीन अपहृत मुलींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. आयुक्तालय हद्दीतील गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक ४ मुलींचे अपहरण झालेले आहे. तर, गेल्या ऑक्टोबरमध्ये २० मुलींचे अपहरण झालेले आहे.

ठाणेनिहाय अपहरण (कंसात ऑक्टोबरमधील आकडेवारी)

गंगापूर -४(१), अंबड ३ (२), उपनगर १ (३), आडगाव २ (०), इंदिरानगर १ (२), देवळाली कॅम्प १ (०), भद्रकाली १ (३), नाशिकरोड १ (४), म्हसरुळ १ (१), सातपूर १ (१), मुंबई नाका ० (१), पंचवटी ० (१), सरकारवाडा ० (१)

Abduction of girl
Nashik Crime: कांदा भरलेला ट्र्क घेऊन चालकाने केला पोबारा; अहमदाबादला पोचलाच नाही!

पालकांनी लक्ष ठेवावे

आपला मुलगा वा मुलगी शाळा-महाविद्यालयात वा कामाच्या ठिकाणी जातात. त्यांचा कोणाशी नियमित संपर्क आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल फोन आहेत. त्यांचा सर्वाधिक कोणाशी बोलणे होते याकडे पालकांनी बारकाईने लक्ष दिले पाहिजे.

मुलांशी नियमित संवाद साधत राहिला पाहिजे. विसंवादामुळे पालक आणि पाल्यांमध्ये दुरावा निर्माण होत असल्याने, पाल्य बाहेरील व्यक्तीकडे आकर्षित होत असतो. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष असावे वा नियमित संवाद असावा. त्यांच्याशी विश्वासाने संवाद साधल्यास ते घर सोडून जाण्याची शक्यता कमी होते.

"वयानुरूप मुले-मुलींमध्ये शारीरिक आकर्षण असते. त्यात सोशल मीडियाच्या अतिवापराचेही दुष्परिणाम आहेत. मात्र वेळीच मुलांना सामाजिक भान आणि मानसिक समुपदेशन केले गेले वा, पालकांनी पाल्यांशी नियमित संवाद साधत राहिले तर असे प्रकार रोखले जाऊ शकतात. अथवा सामंजस्याने अशी प्रकरणे हाताळता येऊ शकतात." - डॉ. सीताराम कोल्हे, सहायक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा.

Abduction of girl
Nashik Cyber Crime: सावधान! सायबर गुन्हेगारांकडून AI चा होतोय गैरवापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com