Mission Bhagirathi : मिशन भागिरथीमधून 150 गावांमध्ये होणार 600 बंधारे

mission bhagirathi
mission bhagirathiesakal

नाशिक : जिल्ह्यातील दरवर्षींचा दुष्काळ पिण्यासाठी टॅंकरने पाणी (Water) पुरवठा करणे हे दुष्काळी गावातील चित्र पालटण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा टॅंकरमुक्त करण्याचा संकल्प करत, ‘मिशन भागीरथी प्रयास’ हाती घेतले आहे. (600 dams will be constructed in 150 villages through Mission Bhagiratha nashik news)

या मिशन अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात जलसंधारणाची सुमारे ६०० कामे हाती घेतली आहेत. या कामांची रक्कम जवळपास १०० कोटी रुपये असून या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १२ तालुक्यांमधील १५० गावांमध्ये पाच ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान बंधारे बांधले जाणार आहेत.

गुजरात सीमावर्ती भागातील ५५ हून अधिक गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचे सांगत, थेट गुजरात राज्याला जोडण्याची मागणी केल्यानंतर, सुरगाणा तालुक्याच्या विकासासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सुरगाणा तालुक्याचा दौरा करत माहिती घेतली. त्यावेळी सुरगाणा तालुक्यातील समस्या सोडवण्यासाठी त्यांनी एक आराखडा तयार करण्याच्या सूचना जि.प.च्या सर्व विभागांना दिल्या असून तो आराखडा अंतिम टप्प्यात आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

mission bhagirathi
Nashik News : 12 हजार स्वयंरोजगारांना होणार कर्ज वितरण

त्यात पावसाळ्यानंतर सिंचनाच्या सुविधा नसल्यामुळे त्या तालुक्यातून रोजगारासाठी स्थलांतर होत असल्याचा मुद्दा समोर आला. हा केवळ सुरगाणा तालुक्यातीलच नाही, तर संपूर्ण जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये दरवर्षी दुष्काळ असतो. येथे टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागतो.

यासाठी मित्तल यांनी रोजगार हमी योजनेतून जलसंधारणाच्या सुविधा उभारण्यासाठी मिशन भागीरथी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जलसंधारण विभागाने सर्व तालुक्यांमध्ये सर्वेक्षण करून नाल्यांवर बंधारे बांधण्यासाठीची ठिकाणे निश्‍चित केली आहेत.

त्यात सुरगाणा, पेठ, बागलाण, दिंडेारी, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, येवला, चांदवड, देवळा, नांदगाव व मालेगाव या तालुक्यांमधील १५० गावे निश्‍चित करण्यात आली आहेत. प्रत्येक गावामध्ये पाच ते सहा बंधारे बांधण्यात येणार आहेत.

mission bhagirathi
Bharati Pawar : जिल्ह्यात नव्याने होणार 3 आरोग्य उपकेंद्र!

यात पाच ते ३० लाख रुपयांच्या मर्यादेत गरजेनुसार बंधाऱ्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या कामांचा ग्रामपंचायत विभागाकडून रोजगार हमी योजनेच्या आराखड्यात समावेश करण्यात आला असून पुढील आठवड्यात या कामांना ग्रामपंचायत विभागाकडून प्रशासकीय मान्यता दिल्या जातील. मार्चपासून या कामांना प्रत्यक्षात सुरवात होणार आहे.

"महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून प्रत्येक गावात बंधारे बांधण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व ठिकाणी एकाच वेळी बंधारे बांधून त्या गावातून वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवले जाईल. त्यातून भूजल पातळी वाढण्याबरोबरच रब्बी हंगामात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील.

त्यातून पहिल्या वर्षी १५० गावांमध्ये ६०० कामे हाती घेतली जाणार आहेत. रोजगार हमी योजनेतून बंधारे बांधण्यासाठी ९० टक्के काम यंत्राने व १० टक्के काम मजुरांकडून करून घेण्याची परवानगी आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यासाठीचे ६०:४० प्रमाण राखत जिल्हा परिषदेने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे." - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

तालुकानिहाय गावे व कामांची संख्या

तालुका गावांची संख्या कामांची संख्या

दिंडोरी १५ ६४

पेठ २७ ७४

कळवण १८ ६०

सुरगाणा २१ ११४

सटाणा ०९ ४४

देवळा ०८ ३२

इगतपुरी ०५ १३

त्र्यंबकेश्‍वर १२ ४६

चांदवड १० ३७

मालेगाव ०७ ५०

येवला ०३ १५

mission bhagirathi
Nashik News : ट्रॅक्टरखाली सापडून ऊसतोड कामगाराच्या चिमुरडीचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com