Aditya Thackeray | खोके सरकारकडून पोकळ अश्‍वासनं : आदित्य ठाकरे

Yuva Sena chief Aditya Thackeray while interacting with citizens during Shivsamwad Yatra on Tuesday.
Yuva Sena chief Aditya Thackeray while interacting with citizens during Shivsamwad Yatra on Tuesday.esakal

सिन्नर (जि. नाशिक) : अतिवृष्टीमुळे राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या खोके सरकारने पोकळ आश्‍वासनं देत ४ हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, अद्याप एकाही शेतकऱ्यापर्यंत ही मदत पोहचली नाही.

हे सरकार केवळ कंत्राटदार, बिल्डर, व्यावसायिकांचे खिसे भरण्यात समाधान मानत असून जनभावनेचा सरकारकडून खेळ सुरु आहे, अशी टिका आमदार ठाकरे यांनी माळेगाव (ता. सिन्नर) येथील मेळाव्यात केली. (Aditya Thackeray statement opposing cm shinde government nashik news)

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, छोटू ताजनपुरे, सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे, शहरप्रमुख गौरव घरटे, शैलेश नाईक, पिराजी पवार, विलास सांगळे, संजय सानप, अरविंद सांगळे, गणेश आव्हाड, मंगेश सांगळे, आबासाहेब खैरनार, रामनाथ धनगर, किरण घुगे, कैलास आव्हाड, महेंद्र सांगळे, विनायक आव्हाड, शांताराम सांगळे, संजय आव्हाड व्यासपीठावर होते.

माझ्या मागे ‘महाशक्ती’ नाही, तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आणि जनतेचे प्रेम आहे. त्यामुळे गद्दार माझ्या अंगावर येत आहेत. पण, जनता मला सांभाळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी त्यांनी व्यासपिठावरुन थेट जनतेत येत भाषण केले. येणाऱ्या सर्वच निवडणुकांत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा तालुक्यात सर्वच निवडणूकांत भगवा फडकेल असा विश्‍वास श्री. दानवे यांनी व्यक्त केला. श्री. करंजकर यांनीही या वेळी मार्गदर्शन केले. किरण कोथमिरे यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

Yuva Sena chief Aditya Thackeray while interacting with citizens during Shivsamwad Yatra on Tuesday.
Fertilizer Project :खासगीकरणामुळे खत प्रकल्पावरील 84 पदे रद्द

लवकरच सरकार कोसळणार

महाविकास आघाडी सरकारचा काळ हा सुवर्णकाळ होता. कोरोना काळातही राज्यात अनेक विकासकामे झाली. मात्र, खोके घेऊन स्थापन झालेल्या सरकारचे लक्ष केवळ पैसा हाच आहे. राज्यात कायदा सुवस्थेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

महिलांवर अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अधिकारीही याकडे गांभीर्याने बघत नसून, इच्छितस्थळी बदली करुन घेण्यासाठी सरकारला पैसे देत आहे.

कारण त्यांनाही माहित आहे की हे सरकार अल्प दिवसांचे आहे. काही दिवसांतच हे सरकार कोसळणार असून निवडणूका लागतील असा आशावाद ठाकरे यांनी व्यक्त केला.

Yuva Sena chief Aditya Thackeray while interacting with citizens during Shivsamwad Yatra on Tuesday.
Aditya Thackeray | हे सरकार दिल्लीचे आहे की शेतकर्‍यांचे आहे : आदित्य ठाकरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com