Contract Recruitment : कंत्राटी भरती महाविकास आघाडीचे पाप; कृषिमंत्री धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

Dhananjay Munde
Dhananjay Mundeesakal

Dhananjay Munde News : कंत्राटी नोकर भरतीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडल्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीदेखील या प्रकरणी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. सुशिक्षित बेरोजगार तरुण बंधू-भगिनींच्या भरती प्रक्रियेत सगळ्यात मोठे पाप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांसह महाविकास आघाडी सरकारने केले आहे.

(Agriculture Minister Dhananjay Munde statement about Maha Vikas Aghadi on contract recruitment nashik news)

त्या वेळी आम्ही विरोध केला, याबाबत आमच्याकडे नोंद आहे. मात्र, विरोध करूनही ज्यांनी पाप केले, त्यांचे पाप उघडे पडले. महाविकास आघाडीच्या त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्या काळातल्या सहकाऱ्यांनी मिळून हा घाट घातला असल्याचा गंभीर आरोपही मंत्री मुंडे यांनी केला.

कृषिमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी (ता.२०) नाशिक दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कंत्राटी भरतीसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. यावर बोलताना मुंडे यांनी प्रकाश टाकत तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. मुंडे म्हणाले, की कंत्राटी भरतीसंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. मंत्री फडणवीस यांनी याबाबत भूमिका मांडली आहे.

त्यामुळे कृपा करून कशालाही बळी पडू नका, हे सरकार सुशिक्षित बेरोजगार बंधू-भगिनींच्या पाठीमागे ताकदीने उभे आहे. सर्वच्या सर्व जागा सरकारी पद्धतीने भरती केल्या जाणार आहेत. आमिषाला बळी पडू नका, सरकार पूर्णपणे सरकारी नोकरीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना नियमाने सामावून घेणार आहे.

Dhananjay Munde
Devendra Fadnavis : उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आता माफी मागणार का? कंत्राट भरतीवरून फडणवीसांचा थेट सवाल

ते म्हणाले, की तरुण सुशिक्षित बेरोजगार बंधू-भगिनींना माझे या माध्यमातून सांगणे आहे, की हे सरकार पूर्णपणे सरकारी रोजगार देण्यासाठी बांधील आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नाही, तर सरकारमध्ये ज्या पद्धतीने, जशा जागा निघतील आणि निघतात, त्या पद्धतीने भरती केली जाणार आहे.

हा निर्णय जेव्हा झाला, त्या वेळी मुंबईमध्ये पोलिस भरती सुरू झाली. त्या वेळीही या सरकारवर, गृह विभागावर आरोप करण्यात आले, की पोलिस भरतीही कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांना माझी हात जोडून विनंती आहे, की अशा कुठल्याही वायफळ गोष्टीवर विश्वास ठेवू नका, गृह विभागाने या ठिकाणी १८ हजार पदांची पोलिस भरती केली. भरतीनंतर पोस्टिंग मिळेपर्यंत एक वर्षाचा काळ जातो, त्या काळात ही १८ हजार पदे पोलिस ठाण्याला देण्यासाठी जी आवश्यक असतात ती पदे महाराष्ट्र सरकारच्या बोर्डाकडून दिले गेल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले.

Dhananjay Munde
Contract Recruitment: मागच्या सरकारचे पाप मग GR आताच रद्द का केला? देवेंद्र फडणवीसांना पत्रकार परिषदेत सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com