विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
नाशिक : समृद्धी महामार्ग, सुरत-चेन्नई महामार्ग यासारख्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात असताना दुसरीकडे मात्र, ग्रामीण भागात प्रसूतीसाठी वेळात न पोचल्याने रस्त्यातचं १३ मातांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर, ४ गरोदर मातांचा घरीच प्राण सोडले आहे.
दहा महिन्यात एकूण ७५ मातांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. गतवर्षींच्या तुलनेत माता मृत्यूचे प्रमाण काहीसे स्थिर ठेवण्यात आरोग्य विभागाला यंदा यश मिळाले आहे. मात्र, हे माता मृत्यू कमी करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. (nashik SAKAL Exclusive marathi news )
गर्भवती आणि माता कुपोषित राहत असल्याने त्याचा त्यांच्या आणि बालकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. अनेक महिलांना गरोदरपणात मजुरी करावी लागते. शारीरिक क्षमता नसतानाही त्यांना मजुरीला जावे लागते. कमी वयात महिला गरोदर राहतात. गरोदरपणात आवश्यक पोषण आहार मिळत नाही.
परिणामी या माता कुपोषित राहतात. कुपोषित राहत असल्याने माता व त्यांच्या बालकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनेकदा माता आणि बालमृत्यू होतो. वाढत्या माता मृत्यूचा अभ्यास केला असता यात, प्रसूती दरम्यान अतिरक्तस्राव, गरोदरपणातील उच्च रक्तदाब, रक्तक्षय (हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे) या कारणांनी मातांचा मृत्यू होत असल्याचे निर्दशनास आले.
त्यासाठी आरोग्य विभागाने मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी माता मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करण्यासाठी समितीची स्थापना केली. यात मातांचा मृत्यू नेमके कोणत्या कारणांनी होत असल्याची कारणे शोधली. त्यातील महत्त्वाचे कारण असलेले कुपोषित माता असल्याचे निर्दशनास आले.
त्यासाठी मातेचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती, स्तनदा मातांना सकस आहार कसे मिळेल याकडे लक्ष केंद्रित केले. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतंर्गत महिलांना १५० दिवसांत एक हजार, दुसऱ्या टप्प्यात दोन हजार आणि प्रसूतीनंतर दोन हजार रुपये दिले जातात याची अंमलबजावणी काटेकोरपणे राबविली.
गरोदर मातांची नोंदणी आरोग्य केंद्रात बंधनकारक करून सोनोग्राफी करण्यावर भर दिला जात आहे. दरमहा ९ तारखेला पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत गरोदर मातांची स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासणी बंधनकारक केली. दोन बाळांमध्ये अंतर असावे, कुटुंब नियोजन यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे.
याचा परिणाम, माता मृत्यूचे प्रमाण स्थिर होऊ लागले आहे. १ एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या दहा महिन्याच्या कालावधीत ७५ मातांचा मृत्यू झाला होता. १ एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या दरम्यान ७५ माता दगावल्या आहेत. यात जुलै महिन्यात सर्वाधिक १४ मातांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)
जुलै महिन्यात सर्वाधिक १४ मातांचा मृत्यू
गरोदर माता प्रसुतिला नेत असताना रस्त्यात १३ मातांचा मृत्यू झाला आहे. प्रसूती अगोदर घरातच ४ मातांचा तर, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यात ५ मातांनी आपले प्राण गमावले आहे. जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्यानंतर २६ मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. यात एकूण ७५ मृत्यूमध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक १४ मातांचा मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय झालेले माता मृत्यू
तालुका १ एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ १ एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४
बागलाण १ ६
चांदवड १ ३
देवळा १ २
दिंडोरी ४ २
इगतपुरी ४ ४
कळवण १ ५
मालेगाव २ ०
नांदगाव १ ४
नाशिक ३ २
निफाड १ ६
पेठ ३ -
सिन्नर ५ ३
सुरगाणा १ १
त्र्यंबकेश्वर १ ४
येवला १ ५
मालेगाव मनपा २२ ११
नाशिक मनपा २३ ७
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.