नागपूर : भारत हा एकसंघ देश आहे. आपल्याला कुठेही फिरण्याची मुभा आहे. मात्र, कुठल्याही राज्यात जाताना आपण त्या राज्यातील लोकांशी बोलणे गरजेचे आहे. आज भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले आणि त्यांनी एकाही मराठी माणसाठी संवाद साधला नाही. हे चुकीचे आहे. त्यावर भाजपचे लोक मूग गिळून बसले आहे. त्यांनी याबाबत बोलायला पाहिजे. मात्र, ते बोलत नाहीत. भाजपच्या लोकांनी महाराष्ट्राची अस्मिता गहाण ठेवली आहे का? असा सणसणीत सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अनील अहिरकर यांनी केला.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन उद्योगधंदे त्यांच्या राज्यात नेण्याची भाषा करतात. हे चुकीचे आहे. विदेशात उद्योगधंदे न्यायचे असते तर एकवेळ ठीक होते. कारण विदेशातून आपल्याकडे उद्योगधंदे येत असतात. मात्र, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात उद्योगधंदे हलविणे याला काय म्हणावे? ही पद्धत बरोबर नाही. उत्तरप्रदेशातील लोक महाराष्ट्रात येऊन रोजगार करतात आणि ते उद्योगधंदे नेण्याची भाषा करतात, हे हास्यास्पद आहे, असे अहीरकर म्हणाले.
दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आले होते. मात्र, महाराष्ट्रात येऊन त्यांनी एकाही मराठी माणसाची भेट घेतली नाही. यावरून त्यांच्यावर ठिकठिकाणाहून टीका केली जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.