यवतमाळ : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाचे पडसाद यवतमाळमध्ये पाहायला मिळत आहे. आज शेतकऱ्यांकडून भारत बंदची हाक देण्यात आली. यावेळी बसस्थानक चौकात विविध संघटनांनी निदर्शने केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका दिल्लीतील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. याला यवतमाळ जिल्ह्यात चांगला प्रीतिसाद मिळाला.
कायदा रद्द होईस्तोवर आंदोलन सुरू ठेवणार -
दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भूमिका यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, व सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात हे आंदोलन सुरू असून कुठे चांगला तर कुठे संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.