
सरकारने त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारही बहाल केला. यामुळे त्यांना हुरूप आला. शिंगाडा शेती, वनशेती, कापूस शेती, गांडूळ शेती, मशरूम शेती, संत्रा आणि भाजीपाला यासह अनेक प्रयोग त्यांनी शेतामध्ये केले.
नागपूर : उत्पादन वाढूनही भाव मिळत नाही तर खत आणि शेतात आवश्यक साहित्याच्या किमतीत झपाट्याने वाढ असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. माथी लागलेले आर्थिक दुष्टचक्राची सुटका करण्यासाठी वैद्यनाथन समितीच्या शिफारशी लागू करूनच हे संकट दूर होऊ शकते, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर सरकारचे धोरणच शेतकऱ्यांसाठी मरणाचे तोरण असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पुंडलिक शिवराम घ्यार. ५६ वर्षांचा शेतकरी. भंडारा जिल्ह्यातील व पवनी तालुक्यातील कोटलपार हे त्यांचे मूळ गाव. १२ वी पर्यंत शिक्षण झाले. आधीच शेतीला किंमत असलेल्यांनी नोकरी सोडून शेती केली. घरच्याची साथ मिळाली. १३ एकरांची शेती २८ एकर शेती. हे सर्व त्यांनी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून केले, यात शंका नाही. शेतात विविध प्रयोग करून संपूर्ण जिल्ह्यात आदर्श निर्माण केला.
सरकारने त्यांना शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारही बहाल केला. यामुळे त्यांना हुरूप आला. शिंगाडा शेती, वनशेती, कापूस शेती, गांडूळ शेती, मशरूम शेती, संत्रा आणि भाजीपाला यासह अनेक प्रयोग त्यांनी शेतामध्ये केले.
मात्र, गेल्या काही वर्षात शेती करणे जिव्हारी लागत आहे. खताच्या किमतीसह बी-बियाण्यांच्या किमती मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे शेती करणे आर्थिकदृष्ट्य़ा परवडणारे नाही, अशा खंत शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी पुंडलिक घ्यार यांनी व्यक्त केली.
खर तर शेतीसाठी खत आवश्यक आहे. मात्र, शेतकऱ्यांचे आणि सरकारच्या खताच्या कंपन्यांच्या प्रेमामुळे अनावश्यक खताचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे. जमिनीमध्ये काही जिवाणू असतात. त्यांना पिकांसाठी जिवंत ठेवणे आवश्यक आहे, परंतु, शेतकरी उत्पादन अधिक होईल, या आशेपोटी खताचा नारा अधिक करतो.
या युरियाचे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना परिणाम लवकर हवे असतात, यातूनच शेतामध्ये तो युरियाचे प्रमाण जास्त टाकतो. युरियामुळे पिकाची वाढ होते आणि पिके हिरवेगार दिसतात, यातच शेतकरी फसतो. यासोबत इतरही पोषक घटकांची गरज असते. परंतु, खताच्या किमतीमुळे तो आवश्यक असलेले खत घेत नाही. जमिनी आवश्यक असलेल्या खत शोषून घेतो आणि उर्वरित खत जमिनीच राहते. त्यामुळे जमिनीची पोत खालावते, असे मत कृषितज्ज्ञ दुर्वास चौधरी यांनी व्यक्त केले.
अज्ञानाचा फायदा व्यापारी घेतात
शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा व्यापारी घेत आहेत. यात शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. यातून बाहेर काढणे आवश्यक आहे. मात्र, सरकारच शेतकरीविरोधी कायदे करून त्यांना संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- राजानंद कावळे,
नेते शेतकरी व कामगार
कापसाचा एकरी खर्च
सन २०२०-२१ चा हंगाम (हमीभाव)
उत्पादन (मे.टन)
कृषी पतधोरणाची गरज म्हणून वैद्यनाथन समितीच्या शिफारशी