Abhinav Bharati: "मांस खाणं चूक नाही! देवाला बळी दिलेलं मांस प्रसाद म्हणून खाण्यास हरकत नाही" - शंकराचार्य अभिनव शंकर भारती

अनियंत्रितपणे मांस खाल्यास त्याचे मानवी आरोग्यावर आणि भावनांवर परिणाम होतात. कारण प्राण्यांमध्ये असणारी भावना ही आपण खात असलेल्या मांसमध्ये उतरते, ती शरीरासाठी हानिकारक असते.
Shankaracharya Abhinav Bharati
Shankaracharya Abhinav Bharati
Updated on

नागपूर : मांस खाणं चूक नाही पण दररोज मांस खाणं हे शरीरासाठी हानिकारक ठरतं. त्यामुळं भारतीय परंपरेत देवाला बळी देऊन प्रसाद स्वरूपात दिलेलं मांस खायला सांगून त्याच्या सेवनावर नियंत्रण आणलं असल्याचं मत श्रुंगेरी महासंस्थान शारदा पिठाचे 72 पीठाधीश शंकराचार्य अभिनव शंकर भारती महास्वामी यांनी व्यक्त केलं आहे. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'बनाये जीवन प्राणवाण' या पुस्तकाचं प्रकाशन झालं, या कार्यक्रमात ते उपस्थित होते. हा सोहळा सुरेश भट सभागृहात पार पडला.

Shankaracharya Abhinav Bharati
Sadhvi Harsha: "...त्यांना पाप लागेल", साध्वी हर्षा अखेर कुंभमेळ्यातून पडणार बाहेर; नेमकं काय झालंय? सांगताना अश्रू अनावर
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com