आता कोळशापासून होणार नाही प्रदूषण, महाऔष्णिक वीज केंद्रानं तयार केली हटके यंत्रणा

thermal power station chandrapur created fogger and spray gun system
thermal power station chandrapur created fogger and spray gun system

चंद्रपूर : वीज निर्मितीसाठी कोळशाची आवश्‍यकता आहे. रोप-वेच्या माध्यमातून हा कोळसा मशिनरीपर्यंत पोहोचविला जातो. मात्र, यासर्व प्रक्रियेत कोळशाचे बारीक कण धुळीच्या रूपात उडत होते. त्यातून प्रदूषणाची समस्या निर्माण झाली होती. ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून फॉगर, स्प्रे गण ही यंत्रणा उभारली आहे. आता ही यंत्रणा रोप-वेच्या माध्मयातून मशिनरीपर्यंत जाणाऱ्या कोळशावरील धूळ आधीच काढली जाणार आहे. 

देशातील सर्वांत मोठे वीजकेंद्र म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र ओळखले जाते. या केंद्रात वीज निर्मिती करणारे सात संच होते. त्यातून 2340 मेगॅवॅट वीजनिर्मिती केली जात होती. मात्र, क्रमांक एक आणि दोन हे खूप जुने संच होते. त्यातून प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे हे दोन्ही संच बंद करून नवीन आठ आणि नऊ क्रमांकाचे दोन संच तयार करण्यात आले. त्यामुळे आजघडीला 2920 मेगॅवॅट वीजनिर्मिती केली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होत असल्याने हजारो मेट्रिक टन कोळशाची आवश्‍यकता असते. हा कोळसा मशनरीपर्यंत पोहोचविण्यासाठी रोप-वेचा वापर केला जातो. 

रोप-वेच्या माध्यमातून कोळसा जाताना मोठ्या प्रमाणात धूळ उडून प्रदूषण होत होते. त्यामुळे ही समस्या निकाली काढण्यासाठी वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी पुढाकार घेतला. वीज केंद्र आणि रोप-वे परिसरात कोट्यवधी रुपयांचा खर्च करून स्प्रे गण, फॉगर ही अत्याधुनिक यंत्रणा उभारली आहे. वीज केंद्रात काही यंत्रणा मागील काही वर्षांपासून सुरू होत्या. मात्र, त्यात आता बदल करण्यात आला आहे. कोळसा पुरवठा करताना प्रत्येक टप्प्यावर ही यंत्रणा धूळ प्रदूषण रोखण्याचे काम करीत आहे. अधीक्षक अभियंता राजू सोमकुंवर, कार्यकारी रसायन शास्त्रज्ज्ञ डॉ. विजय येऊल, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय काळे यांच्या पुढाकारातून ही अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे.

सहा संचातून वीजनिर्मिती -
चंद्रपूर वीज केंद्रातील 210 मेगॅवॅटचे दोन आणि 500 मेगॅवॅटचे पाच अशा एकूण सात संचातून वीजनिर्मिती केली जाते. मात्र, आजघडीला आठव्या क्रमांकाचा संच वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी सद्यःस्थितीत बंद आहे. त्यामुळे पाच संचातून वीजनिर्मिती सुरू आहे.

हेही वाचा -

वीजनिर्मितीसाठी पुरवठा होणाऱ्या कोळशातून धूळ प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे रोप-वे परिसरात स्वयंचलित स्प्रे गण आणि फॉगर मशीन लावण्यात आल्या आहेत. या मशीनच्या माध्यमातून कोळसा टाकण्यात येणाऱ्या प्रत्येक टप्यावर पाण्याचे फवारे मारण्यात येत आहे. यातून उडणारी धूळ ही जमिनीवरच रोखण्यात यश येत आहे.
- किशोर राऊत, उपमुख्य अभियंता, महाऔष्णिक वीज केंद्र, चंद्रपूर.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com