गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि गंगा नदीच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी माधव चितळे समितीची स्थापना नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन जलसंपदा मंत्रालयाने दि. 23 जुलै 2016 रोजी केली. ही समिती चार सदस्यीय असेल. या समितीचा कालावधी 3 महिन्यांचा असणार आहे. या समितीमध्ये सचिव जलसंपदा मंत्रालय, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन, सचिव, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, डॉ. मुकेश सिन्हा (संचालक, सेंट्रल पाणी आणि वीज संशोधन केंद्र) यांचा समावेश आहे.
माधवराव चितळे समिती पर्यावरण बदल आणि गंगा नदी प्रवाह अविरत राहावा, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल तसेच बेकायदा वाळू उपसा, पर्यावरण संरक्षण याबद्दलही मार्गदर्शक तत्त्वे ठरविणार आहे. ही समिती जुलै 2016 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या 6 व्या राष्ट्रीय गंगा बेसिन प्राधिकरणच्या बैठकीत, केंद्रीय नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या घोषणेनुसार तयार करण्यात आली.
गंगा नदीविषयी :
जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्याविषयी :
स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.