#स्पर्धापरीक्षा - गंगा नदी

ganga-river
ganga-river

गंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि गंगा नदीच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी माधव चितळे समितीची स्थापना नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन जलसंपदा मंत्रालयाने दि. 23 जुलै 2016 रोजी केली. ही समिती चार सदस्यीय असेल. या समितीचा कालावधी 3 महिन्यांचा असणार आहे. या समितीमध्ये सचिव जलसंपदा मंत्रालय, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन, सचिव, पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय, डॉ. मुकेश सिन्हा (संचालक, सेंट्रल पाणी आणि वीज संशोधन केंद्र) यांचा समावेश आहे. 

माधवराव चितळे समिती पर्यावरण बदल आणि गंगा नदी प्रवाह अविरत राहावा, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल तसेच बेकायदा वाळू उपसा, पर्यावरण संरक्षण याबद्दलही मार्गदर्शक तत्त्वे ठरविणार आहे. ही समिती जुलै 2016 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या 6 व्या राष्ट्रीय गंगा बेसिन प्राधिकरणच्या बैठकीत, केंद्रीय नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या घोषणेनुसार तयार करण्यात आली. 

गंगा नदीविषयी : 

  • भारतातील सर्वात लांब नदी 
  • लांबी 2,510 कि.मी. 
  • जलवाहन क्षेत्र 8,38,200 कि.मी. 
  • गंगेचा उगम - उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील गंगोत्री "भागीरथी' या नावाने उगम 
  • देवप्रयाग येथे अलकनंदा नदी ही गंगेला मिळते 
  • देवप्रयागनंतर भागीरथी-अलकनंदा यांच्या संयुक्त प्रवाहाला "गंगा' हे नाव प्राप्त होते. 
  • बांगलादेशमध्ये गंगा "पद्मा' नावाने वाहते. 
  • पं. बंगाल व बांगलादेश या भागात गंगेच्या असंख्य शाखांचा प्रवाह होऊन जगातील सर्वात मोठा विस्तीर्ण 58,782 कि.मी. क्षेत्रफळाचा त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे. 
  • गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या मुखालगत 16,900 चौ. कि.मी. विस्ताराचा अरण्यमय व दलदलीचा सुंदरबन हा प्रदेश विखुरलेला आहे. हा प्रदेश बंगाली वाघांचे माहेरघर आहे. 

जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्याविषयी :

  • भारतातील "पाणी' या महत्त्वाच्या प्रश्‍नावर कार्य करणारे शास्रज्ञ म्हणून ओळख 
  • जन्म 1934, चाळीसगाव, जि. जळगाव येथे 
  • पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासह बी. ई. सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण 
  • 1956 पासून महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवेत कार्यरत 
  • नियोजन, नदी खोऱ्याचे विकास प्रकल्प, पाटबंधारे आदी क्षेत्रांत तज्ज्ञ म्हणून कार्य 
  • 1981 ते 1983 या काळात महाराष्ट्र शासनाचे सचिव म्हणून कार्यभार 
  • 1984 मध्ये केंद्रीय नदी खोरे आयोगाचे अध्यक्ष 
  • 1985 मध्ये केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष (भारत सरकारचे पदसिद्ध सचिव) 
  • 1989 मध्ये जलसंसाधन मंत्रालयात सचिव 
  • 1992 मध्ये सेवानिवृत्ती 
  • 1993 स्टॉक होम (जल) हा आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com