चंद्रपूर: राजीव गांधी यांच्या काळातील बंद झालेल्या प्रकरणांच्या फाईली पुन्हा उकरून काढून त्यांची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न आताचे राज्यकर्ते करीत आहेत. आता यांना राहुल गांधींची भीती वाटू लागली. त्यामुळेच जुनी प्रकरण उकरून गांधी कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
विदर्भ दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पवार चंद्रपुरात होते. न्यू इंग्लिश शाळेच्या मैदानात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, दिलेली कर्जमाफी शेतकऱयांच्या मेहनतीचा आदर होता. त्याच श्रेय आमचं नाही. सत्तेचा गैरवापर आता सुरू आहे. आकसाचे राजकारण सुरू आहे. हे राज्य सरकार शेतकऱयांना न्याय देईल असे वाटत नाही. सुडाचे राजकारण सुरू केले. इंदिरा गांधी यांना तुरुंगात टाकल्यानंतर 6 महिन्यात त्यांना जनतेने पुन्हा निवडून दिले. हा इतिहास नरेंद्र मोदी विसरले आहेत. दारूबंदी असूनही चंद्रपूर येथे मोठी दारू विक्री. बंदी करायची होती तर ठोस कायदे निर्माण करून केली असती तर काही फायदा झाला असता. मात्र, या राज्यकर्त्यांनी या बंदीच्या निमित्तानं भ्रष्टयाचाराला वाढवले, असेही ते म्हणाले.
'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.