आठवडाभरात परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा संदर्भात निर्णय ;मुश्रीफ

शाळा सुरू करण्याचा संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील आढावा घेण्यात आलेला होता
School
SchoolSakal

अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज कोरोना बाधितांची आकडेवारी दोन हजारांच्या पुढे गेलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये तूर्त बंदच ठेवण्यात येतील. आठवडाभरानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

School
शेती उत्पन्न बाजार समितीच्या २९ कर्मचाऱ्यांची सेवा अधांतरीच

पालकमंत्री मुश्रीफ यांचे प्रजासत्ताक दिनाच्यापूर्वसंध्येला शहरात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची पाहणी केली. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा त्यांनी जिल्हाधिकारी, आरोग्य यंत्रणेकडून आढावा घेतला.पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, की पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच पुणे जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन किमान आठवडाभर शाळा सुरू करायच्या नाहीत, असा निर्णय तेथे घेण्यात आलेला आहे. तशीच परिस्थिती सध्या अहमदनगर जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे येथेही पुढील आठवडाभर शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

School
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला तरूणांनी संतभूमीचा लौकिक वाढविला

आरोग्य यंत्रणा सज्ज

रुग्णसंख्या वाढत असली, तरी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. तसेच मृत्यूचा दरही कमी आहे. कसलीही लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आहेत, ही जमेची बाजू आहे. आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर असलेले तीस बेडचा कक्ष सुरू आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातही रुग्णांवर उपचार केले जात आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने कसलाही धोका नको म्हणून शाळा सुरू करणे तूर्त थांबविण्यात येत आहे. आठ दिवसांनंतर यावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

School
UP Election : मालेगाव स्फोटातील आरोपीची उमेदवारी 'जदयू'कडून मागे!

मुलांचे वेगाने लसीकरण

१५ ते १८ वर्षे वयोगटातील ८० टक्के मुलांचे लसीकरण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांसह इतर वयोगटातील लसीकरणात मुलांचे लसीकरण वेगाने झालेले आहे. हा आकडा शंभर टक्के लवकर होईल, असेही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

शाळांत मोहीम

शाळा सुरू करण्याचा संदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यातील आढावा घेण्यात आलेला होता. तसेच सर्व शाळांमध्ये सॅनिटायझेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याने सर्वत्र शाळांची सफाई केली जात होती. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुलांना शाळेत कसे पाठवायचे, असा प्रश्‍न पालकांना पडला होता. मात्र शाळा आठवडाभर शाळा सुरू न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com