मंदिरे खुली करण्यासाठी जाणून बुजून नवरात्रीचा मुहूर्त - विखे

radhakrishna vikhe
radhakrishna vikheesakal

शिर्डी (जि.अहमदनगर) : दक्षिणेतील तिरूपती मंदिर (tirupati temple) खुले झाले त्यावेळीच राज्यातील सर्व मंदिरे खुली करायला हवी होती. मात्र त्यासाठी नवरात्रीचा मुहूर्त शोधला. केवळ भाजपच्‍या मागणीला विरोध करण्यासाठी मुख्‍यमंत्र्यांनी हा विषय व्‍यक्तिगत प्रतिष्‍ठेचा केला होता का? तसे असेल तर त्यामुळे झालेल्या प्रचंड अर्थिक नुकसानीची जबाबदारी ते स्विकारणार आहेत का. अनेक व्यावसाईक कर्जात बुडाले, काहींना परागंदा व्हावे लागले तर कुणावर आत्महत्येची वेळ आली. शिर्डीच्या अर्थकारणाची झालेली वाताहत हे त्याचे उत्तम उदाहरण. तुम्ही हि छळवणुक का केली. असा संतप्त सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (ता.25) पत्रकारांशी बोलताना उपस्थीत केला.

हा विषय व्‍यक्तिगत प्रतिष्‍ठेचा केला होता का?
विखे पाटीलम्हणाले, देशभरातील इतर राज्‍यांमध्‍ये नियमावली करुन मंदिरे यापूर्वीच खुली करण्यात आली. केवळ भाजप मागणी करतो म्हणून येथील मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले. लोकल, एस.टी. बस, माॅल, बिअरबार सुरू झाले, तेथे गर्दी झाली तर चालेल मात्र भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर कोविड होईल. असा अचाट तर्क मांडण्यात आला. केवळ भाजपच्या आकसापोटी हा अट्टहास करण्यात आला. त्यात या मंदिरांवर अवलंबून असलेल्या व्यावसाईकांचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. राज्य सरकारचेही मोठे उत्पन्न बुडाले. एकट्या साईबाबांच्या शिर्डीत विनाकारण कोट्यावधी रूपयांचे नुकसान सोसण्याची वेळ आली. याची जबाबदारी हे महाविकास आघाडी सरकार स्विकारणार आहे का. त्यांनी आधी राज्यभरातील भाविक आणि रसातळाला गेलेले व्यावसाईक यांची जाहिर माफी मागावी. व्यावसाईकांचे नुकसान भरून द्यायला हवे. जनतेच्या श्रध्दा पायदळी तुडविणारे आणि सामान्य व्यावसाईकांच्या व्यवसायावर वरंवटा फिरविण्यात राज्यातील सत्ताधा-यांनी धन्यता मानली.

radhakrishna vikhe
राष्ट्रवादीत प्रवेशाचा ट्रेंड सुरू! राहुरीत भाजपला झटका

अपयशाचे खापर दुस-यावर फोडून हे महाविकास आघाडी सरकार मोकळे


आमदार राधाकृष्ण विखे पाटील- आज दिवसभर आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ सुरू होता. जिल्ह्यातील अनेक परिक्षार्थींना परिक्षा केंद्र एका तालुक्यात आणि पत्ता मात्र दुस-या तालुक्याचा देण्यात आला. त्यातील काहींनी त्यातूनही मार्ग काढला, हे विद्यार्थी परिक्षा केंद्राकडे जाण्यास निघाले असताना परिक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला. त्याची कल्पना नसल्याने अनेक विद्यार्थी परिक्षा केंद्रावर पोहोचले. त्याचा वेळ, पैसा व श्रम वाया गेले. अनेक संतप्त विद्यार्थ्यांचे मला फोन आले. स्वतःच्या अपयशाचे खापर दुस-यावर फोडून हे महाविकास आघाडी सरकार मोकळे झाले. कुणाचा पायपोस कुणात नाही. अशी राज्यातील सत्ताधा-यांची स्थीती झालीय.


आरोग्‍य विभागाच्‍या परिक्षेच्‍या संदर्भात झालेल्‍या गोंधळावर भाष्‍य करताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा सावळा गोंधळ रोजच सुरु आहे. त्‍याचे परिणाम विद्यार्थ्‍यांना भोगावे लागत आहेत. महाविकास आघाडी सरकार सगळ्याच परिक्षेत नापास झाले आहे. सरकारच्‍या अनिश्चिततेचा परिणाम जनतेला भोगावा लागत असल्‍याची टिकाही आ.विखे पाटील यांनी यावेळी केली.

radhakrishna vikhe
श्रीरामपूर : सलग दुसऱ्या वर्षी बेलापूरचा अभिषेक युपीएसी उत्तीर्ण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com